शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदारांचे प्रभाग हगणदारीमुक्त

By admin | Updated: June 10, 2016 22:59 IST

स्वच्छ भारत अभियान : शौचालय योजनेवर भाजपाचा प्रभाव

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक व गट शौचालयांची योजना महापालिकेमार्फत युद्धपातळीवर राबविली जात असून, महापालिकेने शहरातील ६१ पैकी ७ प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यात नगरसेवकपदही भूषविणारे भाजपाचे चार आमदार (एकमेव वळगता) तसेच काही सेना-भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या मनसेवर कुरघोडी करत शौचालय योजनेत भाजपाने प्रभाव दाखविल्याने सत्ताधाऱ्यांची दोलायमान स्थिती समोर आली आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात शौचालय उभारणीची योजना राबविली जात आहे. महापालिकेने सर्वेक्षण करून डिसेंबर २०१६ अखेर ७५२८ लाभार्थींना वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करून देण्याचा आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत २३३० वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम झाले असून, ८२२ शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. गट आणि सार्वजनिक शौचालयांचे काम मात्र जागेअभावी रखडले आहे. या योजनेसाठी महापालिकेला आतापर्यंत केंद्रसरकारकडून ५ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. दरम्यान, शहरात युद्धपातळीवर राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत सात प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेला आहे. त्यामध्ये सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १७, पंचवटीतील प्रभाग ११, नाशिकरोडमधील प्रभाग ३३ आणि ५६, सिडकोतील प्रभाग ४६ आणि ४७ आणि नाशिक पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५चा समावेश आहे. प्रभाग ११ हा भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि ज्योती गांगुर्डे, प्रभाग १५ हा आमदार सीमा हिरे व आमदार डॉ. राहुल अहेर, प्रभाग ४६ हा भाजपा आमदार अपूर्व हिरे व सेनेच्या शोभा निकम, प्रभाग १७ हा भाजपा नगरसेवक दिनकर पाटील व त्यांच्या पत्नी लता पाटील, प्रभाग ५६ हा भाजपाचे संभाजी मोरुस्कर आणि सविता दलवाणी, प्रभाग ४७ हा सेनेचे सुधाकर आणि हर्षा बडगुजर यांचा असल्याने शौचालय योजनेवर पूर्णत: भाजपाचा प्रभाव दिसून येत आहे. प्रभाग ३३ हा मनसेचे अशोक सातभाई यांचा प्रभाग असून, सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकाचा हा एकमेव प्रभाग हगणदारीमुक्त होऊ शकला आहे. या सर्व प्रभागांमध्ये शौचालय योजना राबविण्यात येऊन काम पूर्ण झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. महापालिकेत सत्ता मनसेची असताना सदर योजना भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात प्रभावीरीत्या राबविली गेल्याने मनसेच्या नेतृत्वाविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. (प्रतिनिधी)