शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदारांचे प्रभाग हगणदारीमुक्त

By admin | Updated: June 10, 2016 22:59 IST

स्वच्छ भारत अभियान : शौचालय योजनेवर भाजपाचा प्रभाव

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक व गट शौचालयांची योजना महापालिकेमार्फत युद्धपातळीवर राबविली जात असून, महापालिकेने शहरातील ६१ पैकी ७ प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यात नगरसेवकपदही भूषविणारे भाजपाचे चार आमदार (एकमेव वळगता) तसेच काही सेना-भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या मनसेवर कुरघोडी करत शौचालय योजनेत भाजपाने प्रभाव दाखविल्याने सत्ताधाऱ्यांची दोलायमान स्थिती समोर आली आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात शौचालय उभारणीची योजना राबविली जात आहे. महापालिकेने सर्वेक्षण करून डिसेंबर २०१६ अखेर ७५२८ लाभार्थींना वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करून देण्याचा आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत २३३० वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम झाले असून, ८२२ शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. गट आणि सार्वजनिक शौचालयांचे काम मात्र जागेअभावी रखडले आहे. या योजनेसाठी महापालिकेला आतापर्यंत केंद्रसरकारकडून ५ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. दरम्यान, शहरात युद्धपातळीवर राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत सात प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेला आहे. त्यामध्ये सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १७, पंचवटीतील प्रभाग ११, नाशिकरोडमधील प्रभाग ३३ आणि ५६, सिडकोतील प्रभाग ४६ आणि ४७ आणि नाशिक पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५चा समावेश आहे. प्रभाग ११ हा भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि ज्योती गांगुर्डे, प्रभाग १५ हा आमदार सीमा हिरे व आमदार डॉ. राहुल अहेर, प्रभाग ४६ हा भाजपा आमदार अपूर्व हिरे व सेनेच्या शोभा निकम, प्रभाग १७ हा भाजपा नगरसेवक दिनकर पाटील व त्यांच्या पत्नी लता पाटील, प्रभाग ५६ हा भाजपाचे संभाजी मोरुस्कर आणि सविता दलवाणी, प्रभाग ४७ हा सेनेचे सुधाकर आणि हर्षा बडगुजर यांचा असल्याने शौचालय योजनेवर पूर्णत: भाजपाचा प्रभाव दिसून येत आहे. प्रभाग ३३ हा मनसेचे अशोक सातभाई यांचा प्रभाग असून, सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकाचा हा एकमेव प्रभाग हगणदारीमुक्त होऊ शकला आहे. या सर्व प्रभागांमध्ये शौचालय योजना राबविण्यात येऊन काम पूर्ण झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. महापालिकेत सत्ता मनसेची असताना सदर योजना भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात प्रभावीरीत्या राबविली गेल्याने मनसेच्या नेतृत्वाविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. (प्रतिनिधी)