शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

भाजपा आमदारांचे प्रभाग हगणदारीमुक्त

By admin | Updated: June 10, 2016 22:59 IST

स्वच्छ भारत अभियान : शौचालय योजनेवर भाजपाचा प्रभाव

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक व गट शौचालयांची योजना महापालिकेमार्फत युद्धपातळीवर राबविली जात असून, महापालिकेने शहरातील ६१ पैकी ७ प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यात नगरसेवकपदही भूषविणारे भाजपाचे चार आमदार (एकमेव वळगता) तसेच काही सेना-भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या मनसेवर कुरघोडी करत शौचालय योजनेत भाजपाने प्रभाव दाखविल्याने सत्ताधाऱ्यांची दोलायमान स्थिती समोर आली आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात शौचालय उभारणीची योजना राबविली जात आहे. महापालिकेने सर्वेक्षण करून डिसेंबर २०१६ अखेर ७५२८ लाभार्थींना वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करून देण्याचा आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत २३३० वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम झाले असून, ८२२ शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. गट आणि सार्वजनिक शौचालयांचे काम मात्र जागेअभावी रखडले आहे. या योजनेसाठी महापालिकेला आतापर्यंत केंद्रसरकारकडून ५ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. दरम्यान, शहरात युद्धपातळीवर राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत सात प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेला आहे. त्यामध्ये सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १७, पंचवटीतील प्रभाग ११, नाशिकरोडमधील प्रभाग ३३ आणि ५६, सिडकोतील प्रभाग ४६ आणि ४७ आणि नाशिक पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५चा समावेश आहे. प्रभाग ११ हा भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि ज्योती गांगुर्डे, प्रभाग १५ हा आमदार सीमा हिरे व आमदार डॉ. राहुल अहेर, प्रभाग ४६ हा भाजपा आमदार अपूर्व हिरे व सेनेच्या शोभा निकम, प्रभाग १७ हा भाजपा नगरसेवक दिनकर पाटील व त्यांच्या पत्नी लता पाटील, प्रभाग ५६ हा भाजपाचे संभाजी मोरुस्कर आणि सविता दलवाणी, प्रभाग ४७ हा सेनेचे सुधाकर आणि हर्षा बडगुजर यांचा असल्याने शौचालय योजनेवर पूर्णत: भाजपाचा प्रभाव दिसून येत आहे. प्रभाग ३३ हा मनसेचे अशोक सातभाई यांचा प्रभाग असून, सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकाचा हा एकमेव प्रभाग हगणदारीमुक्त होऊ शकला आहे. या सर्व प्रभागांमध्ये शौचालय योजना राबविण्यात येऊन काम पूर्ण झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. महापालिकेत सत्ता मनसेची असताना सदर योजना भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात प्रभावीरीत्या राबविली गेल्याने मनसेच्या नेतृत्वाविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. (प्रतिनिधी)