शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
4
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
5
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
7
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
8
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
9
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
10
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
11
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
12
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
13
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
14
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
15
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
16
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
17
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
18
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
19
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
20
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल वसुलीतून जिल्ह्याला ७५० कोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST

जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक शनिवारी पालकमंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे, दिलीप ...

जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक शनिवारी पालकमंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांनी जिल्ह्यातील वीज व्यवस्थेची अवस्था बिकट असल्याकडे लक्ष वेधले. ३० ते ४० वर्षांचे जुने खांब झाले असून, ते कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त केले जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीतून वीज बळकटीकरणासाठी अधिकाधिक तरतूद करण्यात यावी, असा ठराव करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर भुजबळ यांनीदेखील विजेच्या बळकटीकरणासाठी अधिकाधिक तरतूद करणारा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या तसेच याबाबत प्रस्ताव तयार करून शासनाकडून अतिरिक्त निधी मागण्यात येईल, असे सांगितले.

थकीत वीजबिल भरण्यासाठी शासनाने नवीन वीज धोरणात मार्च २०२२ पर्यंत मुदत दिली असून, ज्या ट्रान्सफार्मर हद्दीतील शेतकरी ८० टक्के बिल भरतील त्यांना तत्काळ वीजजोडणी दिली जाणार असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले. जिल्ह्यातील विजेच्या बळकटीकरणासाठी ४० कोटी मंजूर असले तरी, आणखी २० कोटींची गरज असल्याचे वीज अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यातील वीजग्राहकांकडे तीन हजार कोटी रुपये थकले असून, सूट व व्याज वजा जाता २२८२ कोटीच भरावे लागणार आहेत. एकूण वीज थकबाकी वसुलीतून ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायतींना, तर ३३ टक्के निधी जिल्ह्यासाठी मिळणार असून, ही एकत्रित रक्कम ७५० कोटी रुपये जिल्ह्यातील वीज बळकटीकरणासाठी प्राप्त होणार असल्याची माहिती दिली. गेल्या दहा दिवसांत वीज कंपनीने ६ कोटी रुपये वसूल केले असून, याकामी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

चौकट==

आदिवासी तालुक्यांना आठ ट्रान्सफार्मर

जिल्हा नियोजन विकास समितीतून खर्च करण्यात आलेल्या निधीतून जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी तालुक्यांसाठी प्रत्येकी आठ ट्रान्सफार्मर देण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ट्रान्सफार्मरचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.