शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिल्ह्याला ७३ हजार क्विंटल बियाणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 01:27 IST

यंदा मान्सून वेळेत आणि समाधानकारक पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७३ हजार ६५४ क्विंटल बियाण्याची गरज असून तशी मागणी जिल्हा कृषी विभागाने नोंदविली आहे. 

ठळक मुद्देनियोजन : खासगी क्षेत्रावर अधिक भर

नाशिक : यंदा मान्सून वेळेत आणि समाधानकारक पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७३ हजार ६५४ क्विंटल बियाण्याची गरज असून तशी मागणी जिल्हा कृषी विभागाने नोंदविली आहे. यंदाही बियाणे पुरवठ्याबाबत खासगी क्षेत्रावर अधिक भर देण्यात आला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात बाजरी, ज्वारी, भात, मका, नागली, कापूस, सोयाबिन आदी पिके प्रामुख्याने घेतली जातात. मागील तीन वर्षांत सरासरी ६ लाख २३ हजार ७९ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. तर तीन वर्षांत सरासरी ६३ हजार २३८ क्विंटल बियाण्याचा जिल्ह्याला पुरवठा झाला होता. सन २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबिन वगळता ५ लाख ६५ हजार २७० हेक्टर क्षेत्र खरीप पिकांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्ह्याला ४८ हजार ९२४ क्विंटल मका तर १८  हजार ३६२ क्विंटल भाताच्या बियाण्याची गरज असून तशी मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. महाबीजकडून जिल्ह्याला ७८०१ तर राष्ट्रीय बीजनिर्मितीकडून ३०८५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गतवर्षीच्या  खरिपात ९७,१०२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. बांधावर होणार खत, बियाणे पुरवठा खरीप हंगामात शेतकऱ्यांना बांधावर खत आणि बियाणे पुरविण्याची योजना याही वर्षी राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगितले जात आहे. गतवर्षी या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. २०२० च्या खरीप हंगामात १ लाख ४२ हजार ८९४ शेतकऱ्यांना ३१,०१७ क्विंटल बियाणे व ४५,९२८ मे. टन खत बांधावर पुरविण्यात आले होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती