शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:10 IST

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस झोडपून काढणाºया अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून, कृषी खात्याने शेतकºयाच्या बांधावर जाऊन केलेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यानुसार शेतकºयांना द्यावयाच्या भरपाईसाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे.

ठळक मुद्देअवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरजजिल्हाधिकाºयांचा प्रस्ताव : साडेनऊ हजार हेक्टरवर नुकसान

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस झोडपून काढणाºया अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून, कृषी खात्याने शेतकºयाच्या बांधावर जाऊन केलेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यानुसार शेतकºयांना द्यावयाच्या भरपाईसाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाळा संपल्यानंतर आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्यात पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली होती. वादळी वाºयासह झोडपून काढणाºया पावसाने जिल्ह्णात काही ठिकाणी गारपीटही झाली त्यामुळे खरिपाचे शेतकºयाच्या हाती आलेला हंगामात मोठे नुकसान झाले होते. एकूण साडेसहाशे गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले व त्याचा फटका जवळपास पन्नास हजार शेतकºयांना बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आल्यावर प्रशासनाने वस्तुस्थिती दर्शक पंचनामे करण्याचे आदेश कृषी खात्यास दिल्याने त्यांनी ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेल्या व ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले असता, अवकाळी पावसाने बाजरी, भात, नागली, वरई, भुईमूग, उडीद, सोयाबीन या जिरायती पिकांचे एकूण १४१३ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले तर द्राक्ष, डाळींब, पेरू, ऊस, कांदा, मका या फळपिकांचे ७३६१ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. एकूण ३७७ गावांमधील १९१९७ शेतकºयांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.आताच्या नुकसानीचे पंचनामे हवेतकृषी खात्याने केलेल्या पंचनाम्यानुसार व शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या निकषानुसार ठरवून दिलेल्या प्रत्येक पिकांच्या नुकसानभरपाईच्या रकमेचा विचार करता १५ कोटी ४४ लाख २७ हजार रुपयांची भरपाई शेतकºयांना द्यावी लागणार आहे. कृषी खात्याने यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना सादर केला असून, आता शासनाकडे भरपाईची मागणी केली जाणार आहे. आॅक्टोबरच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी पाठोपाठ ओखी चक्रीवादळानेही जिल्ह्णात प्रचंड नुकसान केल्याने त्यासाठीदेखील पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकºयांकडून होऊ लागली आहे.