शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:10 IST

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस झोडपून काढणाºया अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून, कृषी खात्याने शेतकºयाच्या बांधावर जाऊन केलेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यानुसार शेतकºयांना द्यावयाच्या भरपाईसाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे.

ठळक मुद्देअवकाळीच्या नुकसानभरपाईसाठी जिल्ह्याला पंधरा कोटींची गरजजिल्हाधिकाºयांचा प्रस्ताव : साडेनऊ हजार हेक्टरवर नुकसान

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस झोडपून काढणाºया अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले असून, कृषी खात्याने शेतकºयाच्या बांधावर जाऊन केलेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यानुसार शेतकºयांना द्यावयाच्या भरपाईसाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाळा संपल्यानंतर आॅक्टोबरच्या दुसºया आठवड्यात पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली होती. वादळी वाºयासह झोडपून काढणाºया पावसाने जिल्ह्णात काही ठिकाणी गारपीटही झाली त्यामुळे खरिपाचे शेतकºयाच्या हाती आलेला हंगामात मोठे नुकसान झाले होते. एकूण साडेसहाशे गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले व त्याचा फटका जवळपास पन्नास हजार शेतकºयांना बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आल्यावर प्रशासनाने वस्तुस्थिती दर्शक पंचनामे करण्याचे आदेश कृषी खात्यास दिल्याने त्यांनी ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेल्या व ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले असता, अवकाळी पावसाने बाजरी, भात, नागली, वरई, भुईमूग, उडीद, सोयाबीन या जिरायती पिकांचे एकूण १४१३ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले तर द्राक्ष, डाळींब, पेरू, ऊस, कांदा, मका या फळपिकांचे ७३६१ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. एकूण ३७७ गावांमधील १९१९७ शेतकºयांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.आताच्या नुकसानीचे पंचनामे हवेतकृषी खात्याने केलेल्या पंचनाम्यानुसार व शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या निकषानुसार ठरवून दिलेल्या प्रत्येक पिकांच्या नुकसानभरपाईच्या रकमेचा विचार करता १५ कोटी ४४ लाख २७ हजार रुपयांची भरपाई शेतकºयांना द्यावी लागणार आहे. कृषी खात्याने यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना सादर केला असून, आता शासनाकडे भरपाईची मागणी केली जाणार आहे. आॅक्टोबरच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी पाठोपाठ ओखी चक्रीवादळानेही जिल्ह्णात प्रचंड नुकसान केल्याने त्यासाठीदेखील पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकºयांकडून होऊ लागली आहे.