शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

जिल्ह्यात संततधार कायम

By admin | Updated: July 5, 2016 00:29 IST

बळीराजा सुखावला : पेरण्यांना येणार वेग

नाशिक : रविवारी मुसळधार झालेल्या पावसाने सोमवारीही (दि.४) दिवसभर संततधार कायम ठेवल्याने बळीराजा सुखावला आहे. संततधारेमुळे खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग येण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांच्या भीज पावसाने जमिनीत ओल उतरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.शनिवारी मध्यरात्रीपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यात हजेरी कायम ठेवल्याने काही प्रमाणात बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जून कोरडा गेल्याने खरिपाच्या सुमारे साडेसहा लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्याचे चित्र होते. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावण्यास प्रारंभ केला. आद्राच्या शेवटच्या चरणात सुरू झालेला पाऊस संपूर्ण आद्रा संपेपर्यंत कायम राहिला आहे. आता पुनर्वसू आणि आश्लेषा नक्षत्रावर पावसाची कशी हजेरी राहते, यावरच खरिपाच्या पेरण्यांचे भवितव्य अवलंबून राहील. तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावणाऱ्या जिल्ह्णातील धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यात अल्प प्रमाणात, तर इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी पावसाचा जोर कायम राहिला.