शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्हाधिकारी : बागलाण, मालेगाव तालुक्यात उपाययोजना राबविण्याचे आदेश साठ गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:21 IST

भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत.

सटाणा : भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.शासनाच्या टंचाई कृती आराखड्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात टंचाई निवारणासाठी उपाययोजनाकरण्यात येतात. जिल्हाधिकाºयांनी पाणीटंचाई निवारणासाठी भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीत सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालात, बागलाण व मालेगाव तालुक्यात आॅक्टोबर ते मार्च अखेरपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहणार आहे. त्यामुळे हे सहा महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. मात्र त्यानंतर पाण्याच्या पातळीत घट होऊन एप्रिल ते जून हे तीन महिने साठ गावांना पाण्याची टंचाई निर्माण होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी साठे गावे टंचाईग्रस्त घोषित करून, संबंधित गावांना खबरदारीच्या सूचना करून पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. हे ३१ जुलै २०१८ पर्यंत लागू राहणार आहेत.या गावांमध्ये पाणीटंचाईघोषित केलेल्या गावांमध्ये बागलाण तालुक्यातील चिराई, महड, सारदे, वायगाव, रातीर, देवळाणे, सुराणे, राजपूरपांडे, श्रीपूरवडे, टिंगरी, उत्राणे, वडे खुर्द, वाघळे, ब्राह्मणपाडे, जायखेडा, जाखोड, करंजाड, लाडूद, निताणे, सोमपूर, आसखेडा, द्याने, फोपीर, खिरमाणी, कोटबेल, नामपूर, अजमीर सौंदाणे, कºहे, जुनी शेमळी, लखमापूर, यशवंतनगर, अंतापूर, दगडपाडा, जामोटी, मोराणे दिगर, मुल्हेर, रावेर, ताहाराबाद, वडे दिगर, अलियाबाद, बाभुळणे, बोरदैवत, कांद्याचा मळा, खरड, परशुरामनगर, वाघंबे तसेच मालेगाव तालुक्यातील कजवाडे, पोहाणे, विराणे, भायगाव, अजंग, कोठरे बुद्रूक, सातमाणे, वडनेर, पांढरून या गावांचा समावेश आहे.