शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नोटा न स्वीकारल्याने जिल्हा बॅँकेचे २१ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:32 IST

नाशिक : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेली नोटबंदीची झळ अजूनही नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेला बसत असून, नोटबंदीच्या काळात जिल्हा बॅँकेत एका दिवसात जमा झालेले २१ कोटी रुपये रिझर्व्ह बॅँकेने न स्वीकारल्याने बॅँकेच्या तोट्यात भर पडली आहे. अगोदरच जिल्हा बँक आर्थिक अडचणीतून जात असताना दुसरीकडे रिझर्व्ह बॅँकेकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसून, बॅँकेने सदरचे पैसे परत घ्यावे यासाठी जिल्हा बॅँकेने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने त्यावरही सुमारे ५५ लाखांचा खर्च बँकेला उचलावा लागला आहे. जिल्हा बॅँकेच्या लेखापरीक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

ठळक मुद्देन्यायालयीन दाव्यावर ५५ लाखांचा खर्च : लेखापरीक्षणात स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेली नोटबंदीची झळ अजूनही नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेला बसत असून, नोटबंदीच्या काळात जिल्हा बॅँकेत एका दिवसात जमा झालेले २१ कोटी रुपये रिझर्व्ह बॅँकेने न स्वीकारल्याने बॅँकेच्या तोट्यात भर पडली आहे. अगोदरच जिल्हा बँक आर्थिक अडचणीतून जात असताना दुसरीकडे रिझर्व्ह बॅँकेकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसून, बॅँकेने सदरचे पैसे परत घ्यावे यासाठी जिल्हा बॅँकेने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने त्यावरही सुमारे ५५ लाखांचा खर्च बँकेला उचलावा लागला आहे. जिल्हा बॅँकेच्या लेखापरीक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनात असलेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी रिझर्व्ह बॅँकेने राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बॅँकांकडे असलेल्या रोख चलनाची माहिती तातडीने मागविली होती. (पान ५ वर)त्या संदर्भात सहकारी बॅँकांनी ओरड केल्यानंतर रिझर्व्ह बॅँकेने ही रक्कम स्वीकारली असली तरी, जवळपास आठ महिने सदरची रक्कम जिल्हा बॅँकेच्या तिजोरीत पडून असल्याने या रकमेवर बॅँकेला मात्र ठेवीदारांना व्याज द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर जिल्हा बॅँकेच्या संचालकांनी एका रात्रीतून ज्या २१ कोटी रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या त्या नोटा अद्यापही रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्या नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून सदरची रक्कम बॅँकेत पडून आहे. ही रक्कम रिझर्व्ह बॅँक स्वीकारेल किंवा नाही याची कोणतीही शाश्वती मिळालेली नसल्याने एकप्रकारे हा बॅँकेचा तोटाच असल्याचा अहवाल लेखा परीक्षकांनी दिला आहे. मात्र रिझर्व्ह बॅँकेने ही रक्कम स्वीकारावी यासाठी जिल्हा बॅँकेने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून, त्यासाठी आजवर ५५ लाख १५ हजारांचा न्यायालयीन खर्च झाला आहे. बॅँक अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे व रिझर्व्ह बॅँकेवर आशा लावून बसली आहे. मात्र नोटबंदीमुळे जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती अजूनही सुधारण्याची चिन्हे नाहीत. बॅँकांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल सरकारने नोटबंदी जाहीर केल्यानंतर नागरिकांनी आपल्याकडील जुन्या नोटा तत्काळ बॅँकेत भरण्यास सुरुवात केल्याने बॅँकांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली होती. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या २११ शाखांमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर रक्कम होती. अशातच बॅँकेच्या काही संचालकांनी एका दिवसातच २१ कोटी ३२ लाख रुपये बदलून घेतल्याचा संशय व्यक्त केला गेला. जिल्हा बॅँकेकडे या काळात ३४१ कोटींच्या नोटा जमा झाल्या होत्या. सदरच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने सात ते आठ महिने स्वीकारल्या नाहीत.