शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

नोटा न स्वीकारल्याने जिल्हा बॅँकेचे २१ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:32 IST

नाशिक : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेली नोटबंदीची झळ अजूनही नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेला बसत असून, नोटबंदीच्या काळात जिल्हा बॅँकेत एका दिवसात जमा झालेले २१ कोटी रुपये रिझर्व्ह बॅँकेने न स्वीकारल्याने बॅँकेच्या तोट्यात भर पडली आहे. अगोदरच जिल्हा बँक आर्थिक अडचणीतून जात असताना दुसरीकडे रिझर्व्ह बॅँकेकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसून, बॅँकेने सदरचे पैसे परत घ्यावे यासाठी जिल्हा बॅँकेने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने त्यावरही सुमारे ५५ लाखांचा खर्च बँकेला उचलावा लागला आहे. जिल्हा बॅँकेच्या लेखापरीक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

ठळक मुद्देन्यायालयीन दाव्यावर ५५ लाखांचा खर्च : लेखापरीक्षणात स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेली नोटबंदीची झळ अजूनही नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेला बसत असून, नोटबंदीच्या काळात जिल्हा बॅँकेत एका दिवसात जमा झालेले २१ कोटी रुपये रिझर्व्ह बॅँकेने न स्वीकारल्याने बॅँकेच्या तोट्यात भर पडली आहे. अगोदरच जिल्हा बँक आर्थिक अडचणीतून जात असताना दुसरीकडे रिझर्व्ह बॅँकेकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसून, बॅँकेने सदरचे पैसे परत घ्यावे यासाठी जिल्हा बॅँकेने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने त्यावरही सुमारे ५५ लाखांचा खर्च बँकेला उचलावा लागला आहे. जिल्हा बॅँकेच्या लेखापरीक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनात असलेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी रिझर्व्ह बॅँकेने राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बॅँकांकडे असलेल्या रोख चलनाची माहिती तातडीने मागविली होती. (पान ५ वर)त्या संदर्भात सहकारी बॅँकांनी ओरड केल्यानंतर रिझर्व्ह बॅँकेने ही रक्कम स्वीकारली असली तरी, जवळपास आठ महिने सदरची रक्कम जिल्हा बॅँकेच्या तिजोरीत पडून असल्याने या रकमेवर बॅँकेला मात्र ठेवीदारांना व्याज द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर जिल्हा बॅँकेच्या संचालकांनी एका रात्रीतून ज्या २१ कोटी रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या त्या नोटा अद्यापही रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्या नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून सदरची रक्कम बॅँकेत पडून आहे. ही रक्कम रिझर्व्ह बॅँक स्वीकारेल किंवा नाही याची कोणतीही शाश्वती मिळालेली नसल्याने एकप्रकारे हा बॅँकेचा तोटाच असल्याचा अहवाल लेखा परीक्षकांनी दिला आहे. मात्र रिझर्व्ह बॅँकेने ही रक्कम स्वीकारावी यासाठी जिल्हा बॅँकेने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून, त्यासाठी आजवर ५५ लाख १५ हजारांचा न्यायालयीन खर्च झाला आहे. बॅँक अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे व रिझर्व्ह बॅँकेवर आशा लावून बसली आहे. मात्र नोटबंदीमुळे जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती अजूनही सुधारण्याची चिन्हे नाहीत. बॅँकांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल सरकारने नोटबंदी जाहीर केल्यानंतर नागरिकांनी आपल्याकडील जुन्या नोटा तत्काळ बॅँकेत भरण्यास सुरुवात केल्याने बॅँकांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली होती. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या २११ शाखांमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर रक्कम होती. अशातच बॅँकेच्या काही संचालकांनी एका दिवसातच २१ कोटी ३२ लाख रुपये बदलून घेतल्याचा संशय व्यक्त केला गेला. जिल्हा बॅँकेकडे या काळात ३४१ कोटींच्या नोटा जमा झाल्या होत्या. सदरच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने सात ते आठ महिने स्वीकारल्या नाहीत.