शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:15 IST

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे. जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये कर्जवाटप केवळ नावलाच आहे. महात्मा फुले कृषी कर्जमाफी रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा परतावा करणेही शक्य न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी दिसत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देकळवण : राष्ट्रीयकृत बँकाकडून मात्र टाळाटाळ

कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे. जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये कर्जवाटप केवळ नावलाच आहे. महात्मा फुले कृषी कर्जमाफी रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा परतावा करणेही शक्य न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी दिसत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.एप्रिलपासून सुरु झालेल्या कर्जवाटपात केवळ जिल्हा बँकेने आघाडी घेतली आहे. कोरोना संकटात संपूर्ण जग लॉकडाऊन असताना शेती मात्र अनलॉक होती. जास्तीत जास्त शेतकºयांना पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी पीककर्ज योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना शासनाने दिल्या असल्या तरी कर्ज देतांना राष्ट्रीयकृत बँकानी अडचणींचा डोंगर शेतकºयांपुढे उभा करु न चकरा मारण्यात वेळ घालवला गेला. यंदाच्या खरीप हंगामात एकूण ४६००० हेक्टर क्षेत्रात ९५ टक्के खरीपाची पेरणी झाली आहे.तालुक्यात अन्नधान्याचे क्षेत्र ३८३६४ हेक्टर असून २२११६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून तालुक्यात गळीत धान्य क्षेत्र ७८७६ हेक्टर क्षेत्र असून तालुक्यात ९७९७ हेक्टर क्षेत्रात १२५ टक्के पेरणी झाली आहे.तालुक्यात जिल्हा बँकेने आपल्या १० शाखांच्या माध्यमातून शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करु न दिले. १८३ जनरल सभासदांना २ कोटी १७ लाख ५४ हजाराचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ६५५ अल्प सभासदांना ३ कोटी ४० लाख रु पये असे एकूण ८३८ सभासदांना ५ कोटी ५७ लाख रूपयांचे पीक कर्ज वाटप केले. बँक आॅफ महाराष्ट्र, कळवण, देसराने, अभोणा, कनाशी, ओतूर, बेज शाखा तसेच कॅनरा बँक नांदुरी, युनियन बँक कळवण व स्टेट बँक कळवण, अभोणा शाखा व एच डी एफ सी कळवण शाखा यांनी पीक कर्ज वाटप केले आहे.जिल्हा बँकेपेक्षा राष्ट्रीयीकृत बॅँकामधून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रि या किचकट असल्याने शेतकरी या बँकामध्ये जाणे टाळतात.मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी जिल्हा बँकेची शाखा नसल्याने शेतकºयांना राष्ट्रीयकृत बँकात जावे लागते.मात्र या बँकाकडून शेतकºयांना विविध कागदपत्रांची मागणी तसेच एकाच कामासाठी वांरवार पायपीट करण्यास भाग पाडले जाते.त्यामुळे शेतकरी वैतागून पीक कर्जाची उचलच करीत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक