शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्हा बॅँकेला ‘समृद्धी’ पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:18 IST

जिल्हा बॅँकेने थकबाकीदार सभासदांकडील कर्जवसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली असताना त्याला प्रस्तावित समृद्धी महामार्गाचीही चांगलीच जोड मिळाली असून, बॅँकेकडे कर्जासाठी तारण ठेवलेली जमीन समृद्धी महामार्गासाठी देताना त्यावरील बोजाची रक्कम थेट जिल्हा बॅँकेत वर्ग करण्यात आल्याने जिल्हा बॅँकेला सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्ग चांगलाच पावला आहे.

नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकीदार सभासदांकडील कर्जवसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली असताना त्याला प्रस्तावित समृद्धी महामार्गाचीही चांगलीच जोड मिळाली असून, बॅँकेकडे कर्जासाठी तारण ठेवलेली जमीन समृद्धी महामार्गासाठी देताना त्यावरील बोजाची रक्कम थेट जिल्हा बॅँकेत वर्ग करण्यात आल्याने जिल्हा बॅँकेला सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्ग चांगलाच पावला आहे.  मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या थेट जमिनी खरेदी केल्या जात असून, त्यासाठी बाजारभावाच्या पाचपट दर देण्यात आल्याने आजवर सिन्नर व इगतपुरी या दोन्ही तालुक्यांतून सुमारे ५६ टक्के जमिनीची खरेदी करण्यात येऊन त्यापोटी ६७४ कोटी रुपये जागामालक शेतकºयांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. यात काही शेतकºयांच्या जमिनीवर जिल्हा बॅँकेचा पीक कर्जाचा बोजा चढ विण्यात आला आहे, तर काहींनी शेतजमिनी तारण ठेवून बॅँकेकडून कर्ज घेतले आहे.  राज्यातील शेतकºयांना शासनाने कर्जमाफी जाहीर केली, तर ज्या शेतकºयांकडे दीड लाखापेक्षा अधिक रक्कम थकली आहे त्यांच्या विरोधात जिल्हा बॅँकेने वसुली मोहीम हाती घेतली आहे. यात प्रामुख्याने समृद्धी महामार्गासाठी जागा जात असलेल्या शेतकºयांचाही समावेश आहे. ज्या शेतकºयाच्या जमिनीवर बॅँकेचा बोजा चढला आहे किंवा ज्यांनी शेत तारण ठेवून कर्ज घेतले आहे अशा शेतकºयांना समृद्धी महामार्गाचा मिळालेला मोबदला जिल्हा बॅँकेने कर्जापोटी वर्ग करून घेतला आहे. सिन्नर तालुक्यात अशा प्रकारे तीन कोटी ४१ लाख रुपये जिल्हा बॅँकेच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. अजून जवळपास ५० टक्के जमिनीची खरेदी शिल्लक आहे.तीन कोटी ४१ लाख रुपये मिळालेसिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ज्या ४९ गावांमधून समृद्धी महामार्ग जात आहे त्या जागामालक शेतकºयांकडून जिल्हा बॅँकेला सुमारे १५ कोटी रुपये घेणे आहे. त्यातून एकट्या सिन्नर तालुक्यातून तीन कोटी ४१ लाख रुपये मिळाले असून, इगतपुरी तालुक्यातूनही दीड ते दोन कोटी रुपये मिळाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या वसुलीला चांगलाच हातभार लागला आहे.

टॅग्स :bankबँक