शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात बीएलओ म्हणून महापालिकेचे उरलेसुरले कर्मचारीही जिल्हा प्रशासनाने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:32 IST

करवसुली विभाग अडचणीत : मनपा आयुक्तांची विनंती अव्हेरली

ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनाने आयुक्तांची विनंती ठोकरून लावतानाच करवसुली विभागातील शिल्लक १९ कर्मचा-यांच्याही नियुक्त्या करत दणका दिला आहेबीएलओ नियुक्तीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे काम करणा-या करविभागातील १०३ कर्मचा-यांचा समावेश

नाशिक - जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक कामाकरीता बीएलओ म्हणून महापालिकेच्या करवसुली विभागातील कर्मचा-यांची नियुक्ती करू नये, त्याऐवजी अन्य विभागातील कर्मचारी घ्यावेत, अशी विनंती महापालिकेचे आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला करुनही उपयोग झालेला नाही. कारण, जिल्हा प्रशासनाने आयुक्तांची विनंती ठोकरून लावतानाच करवसुली विभागातील शिल्लक १९ कर्मचा-यांच्याही नियुक्त्या करत दणका दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळे महापालिकेच्या करवसुली विभागाला मोठा फटका बसणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेमार्फत सद्यस्थितीत निवडणूकविषयक कामे सुरू आहेत. घरोघरी जाऊन मतदारांच्या याद्या, नाव-पत्ते अद्ययावत केले जात आहेत. त्यासाठी महापालिकेतील सुमारे ६०० हून अधिक कर्मचा-यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर कर्मचारी महापालिकेत सकाळी पंचींग करत पुढे निवडणूक कामात कार्यरत असतात. या बीएलओ नियुक्तीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे काम करणा-या करविभागातील १०३ कर्मचा-यांचा समावेश आहे. वसुली विभागातील कर्मचारीच नसल्याने महापालिकेचा करविभाग वसुलीच्या बाबतीत पंगु झालेला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून करवसुली विभागातील कर्मचा-यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करु नये, त्याऐवजी अन्य विभागातील कर्मचारी घ्यावेत, अशी विनंती केली होती शिवाय, कोणत्याही स्थितीत वसुली विभागातील कर्मचारी दिले जाणार नाहीत, असा पवित्राही आयुक्तांनी घेतला होता. परंतु, जिल्हा प्रशासनाने आयुक्तांची विनंती धुडकावून तर लावलीच शिवाय, वसुली विभागातील शिल्लक १९ कर्मचा-यांना बीएलओ नियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे संपूर्ण वसुली विभाग रिकामा होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळे महापालिकेचा करवसुली विभाग अडचणीत सापडला आहे.

वसुलीवर परिणाम होणार

महापालिकेला मार्च २०१८ अखेर करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आहे. महापालिकेला तीन महिन्यात ४३ कोटी घरपट्टी तर १५ कोटी पाणीपट्टी वसुली करावयाची आहे याशिवाय, महापालिकेने ६७ हजार मिळकतधारकांना थकबाकी वसुलीच्या नोटीसा बजावल्या आहेत. एकीकडे उत्पन्नवाढीसाठी वसुलीची गति वाढविणे आवश्यक असताना जिल्हा प्रशासनाकडून वसुली विभागातीलच कर्मचारी पळविण्याचा प्रकार घडल्याने महापालिका पेचात सापडली आहे. आता आयुक्त याबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका