शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया शिवपार्वती प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:22 IST

नाशिक : सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया पाच मान्यवरांचा शनिवारी (दि़३) पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़

ठळक मुद्देवैदिक पुरस्कार अनिल महाराज जोशी यांना आध्यात्मिक पुरस्कार डॉ़ बाबासाहेब तराणेकर यांना

नाशिक : सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया पाच मान्यवरांचा शनिवारी (दि़३) पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़ गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलमधील कूर्तकोटी सभागृहात स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या हस्ते पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती आध्यात्मिक पुरस्कार डॉ़ बाबासाहेब तराणेकर (इंदूर), पुण्यश्लोकश्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार नाशिक येथील अनिल महाराज जोशी, नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार नाशिक येथील विनायकशास्त्री दाणी, शंकर हरी औरंगाबादकर शैक्षणिक पुरस्कार पुणे येथील पंडित जकातदार यांना, तर सर डॉ़ आप्पासाहेब गोसावी लोकसेवा पुरस्कार नागपूर येथील डॉ़ एस़ टी़ देशमुख यांना प्रदान करण्यात आला़ प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ़ मो़ स़ गोसावी यांनी सांगितले की, कर्मकांडातून भारतीय संस्कृतीला बाहेर काढायचे असेल विज्ञानाची कास धरावी लागेल व त्यासाठी शिक्षण हे एकमेव हत्यार आहे़ मात्र सद्यस्थितीत परीक्षार्थी जास्त असल्याने यामध्ये विकासाची व संस्थात्मक कामाची तसेच समुपदेशनाची गरज असल्याचे सांगून गोसावी यांनी ४० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला़ पुरस्कारप्राप्त अनिल जोशी यांनी शिवपार्वती प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून मनोगतामध्ये, लहान मुलांवर सुसंस्कार करण्याची गरज असल्याचे सांगितले़ तर पुरस्कारार्थी जकातदार यांनी, सध्याची मोबाइलची पिढी ही पालकांना अत्यवस्थ करीत असून, या पिढीला समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे सांगितले़ त्यासाठी ज्योतिषशास्त्राऐवजी तर्कशास्त्राचा उपयोग करणे हिताचे असून अ‍ॅस्टॉकौन्सिलर ही संज्ञा या पिढीमध्ये समाजात रुजणे गरजेचे असल्याचे सांगितले़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवज्योती या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले़ यावेळी सेवाव्रती अनुबंधी दम्पती, आदर्श संस्था पुरस्कार, वैदेही सर्जनशीलता पुरस्कार, गुणवंत व प्रज्ञावंत यांचा गौरव करण्यात आला़ सूत्रसंचालन मुग्धा जोशी यांनी केले़ डॉ़ के. आऱ शिंपी यांनी आभार मानले़ यावेळी सुनंदाताई गोसावी, कल्पेश गोसावी, डॉ़ दीप्ती देशपांडे, प्राचार्य, कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व अध्यक्ष स्वामिनी स्थितप्रज्ञानंद यांनी आपल्या भाषणात मानवाने आपले कर्म हे फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने केले पाहिजे़ निरपेक्ष भावनेने केलेल्या सामाजिक कार्यामुळे मानवाचे जीवन आनंदमय होत असल्याचे स्वामिनी म्हणाल्या़ यावेळी त्यांनी शिवपार्वती प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले़