शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने  वाहनचालकांना  कचरा पिशव्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:41 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी तसेच नूतनीकरण कामासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे.

पंचवटी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी तसेच नूतनीकरण कामासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे.पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते वाहनचालक-मालकांना कचरा पिशव्यांचे वाटप करण्यात आले.  प्रवासी वाहतूक करणाºया सर्व रिक्षा, कूल कॅब, लक्झरी बसवाहनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालक व मालक यांची संपूर्ण माहिती दर्शविणारा फलक, सामान्य जनतेच्या आरोग्याच्या व सार्वजनिक रस्त्यावरील स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक प्रवासी वाहनात कचरापेटी, कचरा पिशव्या ठेवणे बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार टॅक्सी, वाहनचालक व मालक यांची माहिती दर्शविणारा फलक, वाहनात कचरापेटी बसविण्याचा उद्घाटन सोहळा राधाकृष्णन यांच्या हस्ते पार पडला. प्रादेशिक परिवहन विभागाकडून राबविला जाणारा उपक्रम स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून प्रवासी वाहतूक करणाºया टॅक्सी, स्कूल बस, रिक्षा, लक्झरी सर्व बसगाड्यांमध्ये कचरापेट्या बसवल्या जाणार आहेत.प्रवासी वाहतूक करणाºया सर्व वाहनांमध्ये कचरापेटी बसविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी हा निर्णय घेतलेला आहे. प्रवासी वाहनात अनेकदा प्रवास करताना प्रवासी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, फळांची साले, उरलेले अन्न वाहनांच्या खिडकीतून बाहेर फेकतात परिणामी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरते. नागरिकांना सवय व्हावी तसेच सार्वजनिक स्वच्छता टिकून राहावी यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून हा निर्णय घेतलेला आहे.  - भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान