शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवस लाखो बालके राहिली आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 23:07 IST

नाशिक : अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटापासून शाळकरी मुलांबरोबरच अंगणवाडीतील बालकांना वाचविण्यासाठी शासनाने अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराबाबतची कोणतीही पूर्वतयारी न करता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आल्याने जिल्ह्यातील लाखो बालकांना जवळपास पंधरा दिवस पोषण आहारापासून वंचित राहावे लागले. मात्र त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाने याकामी भरारी घेऊन पोषण आहारांतर्गत राज्यात सर्वाधिक सुमारे १७ लाख अंडी पुरविण्याचा विक्रम नोंदविला आहे.

नाशिक : अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटापासून शाळकरी मुलांबरोबरच अंगणवाडीतील बालकांना वाचविण्यासाठी शासनाने अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराबाबतची कोणतीही पूर्वतयारी न करता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आल्याने जिल्ह्यातील लाखो बालकांना जवळपास पंधरा दिवस पोषण आहारापासून वंचित राहावे लागले. मात्र त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाने याकामी भरारी घेऊन पोषण आहारांतर्गत राज्यात सर्वाधिक सुमारे १७ लाख अंडी पुरविण्याचा विक्रम नोंदविला आहे.राज्य सरकारने १६ मार्चपासूनच शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी शाळांमधून मिळणारे मध्यान्ह भोजन व अंगणवाडीतील शून्य ते तीन व तीन ते सहा अशा दोन वयोगटांतील बालकांना ताजा सकस पोषण आहारदेखील बंद झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख बालकांच्या उदरभरणाचा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासन तसेच एकात्मिक बालविकास सेवायोजनेच्या अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे तब्बल पंधरा दिवसांनंतर या संदर्भातील निर्णय घेऊन खासगी पुरवठादारालाच अंगणवाडीतील बालकांना घरपोहोच पोषण आहार पुरविण्याचे आदेश दिले. त्यानंतर मात्र एकात्मिक बालविकास विभागाने भरारी घेत, अंगणवाडीतील शून्य ते तीन व तीन ते सहा वयोगटांतील बालकांसाठी घरपोहोच पोषण आहार पोहोचविला. अमृत आहार योजनेंतर्गत आदिवासी भागात राज्यात सर्वाधिक १७ लाख अंडींचे वाटप केले.----------कुपोषणामुळे बळीचा इन्कारनाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके आदिवासी असून, या तालुक्यांमध्ये बाराही महिने कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. अल्पवयात केलेले लग्न, आरोग्य सुविधेची वाणवा व रोजगाराच्या अभावामुळे अतिदुर्गम भागात कुपोषण कायम असले तरी, आरोग्य विभागाच्या मते लॉकडाउनच्या काळात कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू झालेला नाही. जन्मत: मृत्यू व आजारापणामुळे होणारे मृत्यू ही नित्याचीच बाब आहे.-------------------सुरक्षित अंतराचे पालनजिल्ह्यात गरोदर व स्तनदा माता असून, त्याचबरोबर किशोरवयीन मुलींचाही विचार करून आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्याची तपासणी, तर अंगणवाडीसेविका, कार्यकर्तींच्या माध्यमातून पोषण आहार, औषधांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी सुरक्षित अंतर राखण्यासाठी गावोगावी मदत केली. आशा सेविकांनी घरोघरी जाऊन तपासणी केली, तर अंगणवाडी सेविकांनी पोषण आहार वितरित केल्याने गर्दी टाळण्यास मदत झाली. काही ठिकाणी ग्रामपंचायतींनीच पुढाकार घेतला.---------------घरपोहोच आहाराचे वाटपअंगणवाडीतील बालकांची संख्या लक्षात घेता १५ मेपर्यंत पुरेल इतका पोषण आहार पोहोचविण्यात आला आहे. त्याचबरोबर गरोदर स्त्रियांसाठी मे महिन्याचा आहारही देण्यात आला असून, आदिवासी बालकांना ‘अमृत आहार’ पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच अंगणवाडी सेविकांनी गावोगावी, घरोघरी जाऊन हात धुण्याचे प्रात्यक्षिके करून नागरिकांना जागरूक केले आहे.- दीपक चाटेमहिला व बालविकास अधिकारी----------------चिमुरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदतशासनाच्या वतीने अंगणवाडीतील मुलांना दिला जाणारा पोषण आहार लॉकडाउनच्या काळातही वेळेत मिळत आहे. सध्याचीग्रामीण भागातील रोजगाराची परिस्थिती अत्यंत खराब आहे. अशा बिकट परिस्थितीत आमच्या लहानग्यांना मिळणारा पोषण आहार खºया अर्थानेमुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी कामी पडत आहे.- ज्योती विलास काकडपालक, नायगाव (सिन्नर)-----------------------------बालक, पालकांच्या जागृतीवर भरलॉकडाउनच्या काळापासूनच अंगणवाडी सेविकांची जबाबदारी वाढली होती. बालके, स्तनदा व गरोदर मातांना पोषण आहार पुरविण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची जबाबदारीही होती. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन पोषण आहार तर पुरविलाच, परंतु पालकांना पाककृती समजावून सांगितली. त्याचबरोबर आरोग्यविषयक जागृती करण्यात आली.- उत्तरा कुमावतअंगणवाडी पर्यवेक्षक----------------------

टॅग्स :Nashikनाशिक