शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

कोळवन नदीवरील पुलाचे काम रखडल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:25 IST

दिंडोरी तालुक्यातील पाडे-निगडोळ-ननाशी-बाºहे आदी विविध गावांना जोडणारा जवळचा मार्ग असलेला निळवंडी येथील कोळवन नदीवरील पूल सात-आठ वर्षांपासून रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे तर पाडे निळवंडी येथील शेतकरी विद्यार्थ्यांना चार महिने १५ किलोमीटरचा हेलपाटे घालत प्रवास करावा लागत आहे.

दिंडोरी तालुक्यातील पाडे-निगडोळ-ननाशी-बाºहे आदी विविध गावांना जोडणारा जवळचा मार्ग असलेला निळवंडी येथील कोळवन नदीवरील पूल सात-आठ वर्षांपासून रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे तर पाडे निळवंडी येथील शेतकरी विद्यार्थ्यांना चार महिने १५ किलोमीटरचा हेलपाटे घालत प्रवास करावा लागत आहे. आघाडी शासन काळात विशेष सुविधा अंतर्गत सुरू झालेले पुलाच्या कामाची योजनाच भाजप शासनाने गुंडाळल्याने गेले पाच वर्ष पिलरच उभे असून, वारंवार सदर काम वेगळ्या योजनेत मंजूर असल्याचे सांगितले जात आहे. आता तरी या पुलाचे काम होईल अशी अपेक्षा असली तर यंदाचा पावसाळा पुन्हा येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून अन् पुण्याहून पुणतांबा करीतच प्रवास करावा लागणार आहे. तालुक्याच्या पश्चिम भागाला जवळचा मार्ग असलेल्या दिंडोरी-निळवंडी-पाडे मार्गावर कोळवन नदीवर जुनी फरशी असल्याने पावसाळ्यात होणारी अडचण पाहता सात वर्षांपूर्वी मोठ्या पुलाला मंजुरी मिळाली. जुनी फरशी निम्मी तोडत नव्याने पुलाचे कामही सुरू झाले. मात्र पुढे आघाडी शासनाची सत्ता जात भाजपची सत्ता आली व पूल ज्या योजनेत होता ती योजनाच बंद झाली परिणामी तापर्यंत जेवढे काम झाले तेवढ्यावरच काम बंद पडले. सदर हेडच (योजना) बंद झाल्याने गेली पाच वर्षे या कामाचे हेड शोधण्यातच गेले असून, आता कुठे त्याला हेड सापडत सदर पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लक्ष घातल्याने उर्वरित कामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच टेंडर प्रोसेस होत काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, हा पूल रखडल्याने विद्यार्थी व प्रवाशांना वलखेडमार्गे दूरचा प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे सदर पुलाचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक