शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

कोळवन नदीवरील पुलाचे काम रखडल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:25 IST

दिंडोरी तालुक्यातील पाडे-निगडोळ-ननाशी-बाºहे आदी विविध गावांना जोडणारा जवळचा मार्ग असलेला निळवंडी येथील कोळवन नदीवरील पूल सात-आठ वर्षांपासून रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे तर पाडे निळवंडी येथील शेतकरी विद्यार्थ्यांना चार महिने १५ किलोमीटरचा हेलपाटे घालत प्रवास करावा लागत आहे.

दिंडोरी तालुक्यातील पाडे-निगडोळ-ननाशी-बाºहे आदी विविध गावांना जोडणारा जवळचा मार्ग असलेला निळवंडी येथील कोळवन नदीवरील पूल सात-आठ वर्षांपासून रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे तर पाडे निळवंडी येथील शेतकरी विद्यार्थ्यांना चार महिने १५ किलोमीटरचा हेलपाटे घालत प्रवास करावा लागत आहे. आघाडी शासन काळात विशेष सुविधा अंतर्गत सुरू झालेले पुलाच्या कामाची योजनाच भाजप शासनाने गुंडाळल्याने गेले पाच वर्ष पिलरच उभे असून, वारंवार सदर काम वेगळ्या योजनेत मंजूर असल्याचे सांगितले जात आहे. आता तरी या पुलाचे काम होईल अशी अपेक्षा असली तर यंदाचा पावसाळा पुन्हा येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून अन् पुण्याहून पुणतांबा करीतच प्रवास करावा लागणार आहे. तालुक्याच्या पश्चिम भागाला जवळचा मार्ग असलेल्या दिंडोरी-निळवंडी-पाडे मार्गावर कोळवन नदीवर जुनी फरशी असल्याने पावसाळ्यात होणारी अडचण पाहता सात वर्षांपूर्वी मोठ्या पुलाला मंजुरी मिळाली. जुनी फरशी निम्मी तोडत नव्याने पुलाचे कामही सुरू झाले. मात्र पुढे आघाडी शासनाची सत्ता जात भाजपची सत्ता आली व पूल ज्या योजनेत होता ती योजनाच बंद झाली परिणामी तापर्यंत जेवढे काम झाले तेवढ्यावरच काम बंद पडले. सदर हेडच (योजना) बंद झाल्याने गेली पाच वर्षे या कामाचे हेड शोधण्यातच गेले असून, आता कुठे त्याला हेड सापडत सदर पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लक्ष घातल्याने उर्वरित कामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच टेंडर प्रोसेस होत काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, हा पूल रखडल्याने विद्यार्थी व प्रवाशांना वलखेडमार्गे दूरचा प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे सदर पुलाचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक