शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

नाशिकला हुलकावणी

By admin | Updated: February 16, 2016 01:10 IST

३१वा क्रमांक : ‘स्मार्ट सिटी’ पाठोपाठ दुसरा धक्का

 नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानात टॉप २० मध्ये समावेश होऊ न शकलेल्या नाशिकला आता केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत करण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणानुसार जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या दहा शहरांच्या यादीत स्थान मिळू शकलेले नाही. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने घोषित केलेल्या यादीत नाशिक ३१व्या क्रमांकावर असून, पहिल्या वीस शहरांमध्ये महाराष्ट्रातील सात शहरांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ ही महत्त्वाकांक्षी योजना २ आॅक्टोबर २०१४ पासून देशात सुरू केली. या स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होते आहे किंवा नाही यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने देशभरातील ७५ शहरांची निवड करत त्याठिकाणी स्वच्छतेसंबंधीची पाहणी केली. त्यात नाशिक शहराचा समावेश होता. सदर सर्वेक्षणानंतर मूल्यांकन करत शहरांना श्रेणी बहाल केली जाणार होती. त्यानुसार, केंद्रीय शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ शहरांची यादी घोषित केली. पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये नवव्या क्रमांकावर पिंपरी चिंचवड तर दहाव्या क्रमांकावर बृहन्मुंबईचा समावेश आहे. नाशिक मात्र ३१ व्या क्रमांकावर असून पुणे- ११, नवी मुंबई- १२, ठाणे- १७ आणि नागपूर- २० व्या क्रमांकावर आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत सदर सर्वेक्षण करण्यात आले होते. मागील महिन्यात ८ ते ११ जानेवारी या कालावधीत नाशिक शहराचा स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी आश्विनीकुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक नाशिक दौऱ्यावर आले होते. सदर पथकाने शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या शौचालय योजनेची, तसेच कचरा संकलनाच्या प्रक्रियेची माहिती संकलित केली होती. त्यासाठी पथकाने नागरिकांशीही संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली होती. महापालिकेने नंतर ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमाही राबविल्या होत्या. परंतु, स्मार्ट सिटी अभियानापाठोपाठ केंद्राच्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेतही नाशिकला हुलकावणी मिळाली. प्रामुख्याने, गोदावरी नदी प्रदूषणासह शहरातील खतप्रकल्पासंदर्भात उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेचे वारंवार कान उपटले आहेत. परंतु, महापालिका त्यावर ठोस उपाययोजना राबवू शकलेली नाही. दरम्यान, केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने उदयोन्मुख शहरांच्या यादीत नाशिकचा समावेश केला असल्याने भविष्यात नाशिक महापालिका आता काय सुधारणा करते, यावरच पुढच्या वेळी यादीत वरचा क्रमांक अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)