शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

अभोण्यात खंडित वीजपुरवठा

By admin | Updated: March 2, 2017 00:50 IST

अभोणा : वीज वितरण कंपनीच्या अभोणा उपविभागातील क्षेत्रातील गावांच्या शिवारातील विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण झाली आहे

अभोणा : वीज वितरण कंपनीच्या अभोणा उपविभागातील कनाशी फीडर क्षेत्रातील गोसराणे, बार्डे, जयपूर, बेलबारे, साबळेपाडा आदि गावांच्या शिवारातील विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.दोन महिन्यांपासून कनाशी फीडर क्षेत्रात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातील पिकांना पाणी भरणे गरजेचे आहे. मात्र, किमान पाच मिनिटेही वीज टिकत नसल्याने गोसराणे, जयपूर, बार्डे, बेलबारे, साबळेपाडा आदि गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अस्मानी-सुलतानी संकटामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेवर पिकांची लागवड केली आहे. रब्बी व बागायती पिके हातातोंडाशी आलेली असतानाच विजेच्या लपंडावाचा सामना परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु, संबंधित विभागाने दखल न घेतल्याने सध्या विहिरींमध्ये मुबलक पाणी असले तरी विजेअभावी ते शेतातील पिकांना देता येत नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा सहायक अभियंता एस. पी. ढगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर बाळासाहेब भदाणे, पंडित वाघ, बाळासाहेब मोरे, योगेश मोरे, राजेंद्र पाटील, दौलत पवार, घनशाम सोनवणे, रंजित चव्हाण आदिंसह कनाशी परिसरातील शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)