शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
3
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
4
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
5
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
6
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
7
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
8
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
9
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
10
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
11
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
12
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
13
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
14
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
15
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
16
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
17
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
18
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
19
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   

हनुमान जन्मस्थळाच्या वाद; धर्मसभेचा ‘आखाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 02:06 IST

हनुमाचे जन्मस्थान त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंधा या मुद्द्यावरून धर्मसभेचा अक्षरश: आखाडा झाला. धर्मसभेची सुरुवातच उच्चस्थानी बसण्याच्या वादावरून झाली आणि बहिष्कार नाट्यानंतर प्रदीर्घ चर्चा होऊनही जन्मस्थानाचा मुद्दा बाजूलाच राहिला. चर्चा भरकटल्याने शंकराचार्यांच्या कथित अवमानावरून धर्मसभेत दोन महंतांमध्ये चांगलेच ‘रामायण’ घडले आणि कोणत्याही निर्णयाविनाच धर्मसभा गुंडाळण्यात आल्याने दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपाचे बाण सोडले जात आहेत.

नाशिक : हनुमाचे जन्मस्थान त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंधा या मुद्द्यावरून धर्मसभेचा अक्षरश: आखाडा झाला. धर्मसभेची सुरुवातच उच्चस्थानी बसण्याच्या वादावरून झाली आणि बहिष्कार नाट्यानंतर प्रदीर्घ चर्चा होऊनही जन्मस्थानाचा मुद्दा बाजूलाच राहिला. चर्चा भरकटल्याने शंकराचार्यांच्या कथित अवमानावरून धर्मसभेत दोन महंतांमध्ये चांगलेच ‘रामायण’ घडले आणि कोणत्याही निर्णयाविनाच धर्मसभा गुंडाळण्यात आल्याने दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपाचे बाण सोडले जात आहेत.रामभक्त हनुमान यांच्या जन्मस्थळाचा वाद सध्या चर्चेत आल्याने यावर तोडगा काढण्यासाठी नाशिकरोड येथे महर्षी पंचायतन सिद्धपीठममध्ये महंत अनिकेत देशपांडे यांनी धर्मसभेचे आयोजन केले होते. सभेच्या सुरुवातीलाच नाशिकचे साधू-महंत आणि गोविंदानंद सरस्वती यांच्यात आसनावर बसण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. गोविंदानंद यांनी खाली बसूनच चर्चा करावी, अशी भूमिका घेत साधू-महंतांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. तब्बल दीड तासानंतर गोविंदानंद हे खाली बसण्यास तयार झाल्यानंतर धर्मसभेला सुरुवात झाली.

वेदमंत्र पठणानंतर धर्मसभेचे कामकाज सुरू झाले. यावेळी शांताराम शास्त्री भानोसे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, अनिकेत शास्त्री देशपांडे, मधुर गोपालदास जोशी, महंत सुधीरदास, श्रीनाथनंद, रामचंद्र गोपाळदास आदी साधू-महंत तसेच देवांग जानी यांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे अनेक दाखले स्वामी गोविंदानंद यांना दिले. केंद्र सरकारच्या वेबसाइटवर असलेल्या सर्वेक्षणाचे दाखलेदेखील यावेळी सचित्र मांडण्यात आले. तरीही स्वामी गोविंदानंद हे वाल्मीकी रामायण हेच प्रमाण असल्याचे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने वाद अधिकच वाढत गेला.गोविंदानंद हे कोणतेही प्रमाण, पुरावे, दस्ताऐवज, शास्त्रातील उल्लेख मानण्यासच तयार नसल्यामुळे चर्चा एकतर्फी होणार असेल तर यावर कोणताच निर्णय होणार नसल्याच्या मुद्द्यावर नाशिककर साधू-महंतांनी गोविंदानंद यांना चांगलेच घेरले. अंजनेरीचा पुरावा मागणारे आपण कोण?आणि आपला काय अधिकार आहे अशी टोकाची चर्चा होऊ लागल्याने गोविंदानंदानाच आपली परंपरा आणि आपण कोणत्या आखाड्याचे आहात, असा प्रश्न साधू-महंतांनी केला. त्यावर त्यांनी चर्चा भरकटविण्याचा प्रयत्न केला आणि मूळ मुद्दा सोडून दिल्याने गोंधळ अधिकच वाढला. या गोंधळातच गेाविंदानंद आणि आपले गुरू द्वारकापीठाधिश्वर शंकराचार्य यांचा उल्लेख करतानाच महंत सुधीरदास यांनी शंकाराचार्य काँग्रेसधार्जिणे असल्याचा उल्लेख करताच गोविंदानंद भडकले आणि वादाच्या आखाड्यातच सारेच उतरले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम