शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान जन्मस्थळाच्या वाद; धर्मसभेचा ‘आखाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 02:06 IST

हनुमाचे जन्मस्थान त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंधा या मुद्द्यावरून धर्मसभेचा अक्षरश: आखाडा झाला. धर्मसभेची सुरुवातच उच्चस्थानी बसण्याच्या वादावरून झाली आणि बहिष्कार नाट्यानंतर प्रदीर्घ चर्चा होऊनही जन्मस्थानाचा मुद्दा बाजूलाच राहिला. चर्चा भरकटल्याने शंकराचार्यांच्या कथित अवमानावरून धर्मसभेत दोन महंतांमध्ये चांगलेच ‘रामायण’ घडले आणि कोणत्याही निर्णयाविनाच धर्मसभा गुंडाळण्यात आल्याने दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपाचे बाण सोडले जात आहेत.

नाशिक : हनुमाचे जन्मस्थान त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंधा या मुद्द्यावरून धर्मसभेचा अक्षरश: आखाडा झाला. धर्मसभेची सुरुवातच उच्चस्थानी बसण्याच्या वादावरून झाली आणि बहिष्कार नाट्यानंतर प्रदीर्घ चर्चा होऊनही जन्मस्थानाचा मुद्दा बाजूलाच राहिला. चर्चा भरकटल्याने शंकराचार्यांच्या कथित अवमानावरून धर्मसभेत दोन महंतांमध्ये चांगलेच ‘रामायण’ घडले आणि कोणत्याही निर्णयाविनाच धर्मसभा गुंडाळण्यात आल्याने दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपाचे बाण सोडले जात आहेत.रामभक्त हनुमान यांच्या जन्मस्थळाचा वाद सध्या चर्चेत आल्याने यावर तोडगा काढण्यासाठी नाशिकरोड येथे महर्षी पंचायतन सिद्धपीठममध्ये महंत अनिकेत देशपांडे यांनी धर्मसभेचे आयोजन केले होते. सभेच्या सुरुवातीलाच नाशिकचे साधू-महंत आणि गोविंदानंद सरस्वती यांच्यात आसनावर बसण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. गोविंदानंद यांनी खाली बसूनच चर्चा करावी, अशी भूमिका घेत साधू-महंतांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. तब्बल दीड तासानंतर गोविंदानंद हे खाली बसण्यास तयार झाल्यानंतर धर्मसभेला सुरुवात झाली.

वेदमंत्र पठणानंतर धर्मसभेचे कामकाज सुरू झाले. यावेळी शांताराम शास्त्री भानोसे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, अनिकेत शास्त्री देशपांडे, मधुर गोपालदास जोशी, महंत सुधीरदास, श्रीनाथनंद, रामचंद्र गोपाळदास आदी साधू-महंत तसेच देवांग जानी यांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे अनेक दाखले स्वामी गोविंदानंद यांना दिले. केंद्र सरकारच्या वेबसाइटवर असलेल्या सर्वेक्षणाचे दाखलेदेखील यावेळी सचित्र मांडण्यात आले. तरीही स्वामी गोविंदानंद हे वाल्मीकी रामायण हेच प्रमाण असल्याचे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने वाद अधिकच वाढत गेला.गोविंदानंद हे कोणतेही प्रमाण, पुरावे, दस्ताऐवज, शास्त्रातील उल्लेख मानण्यासच तयार नसल्यामुळे चर्चा एकतर्फी होणार असेल तर यावर कोणताच निर्णय होणार नसल्याच्या मुद्द्यावर नाशिककर साधू-महंतांनी गोविंदानंद यांना चांगलेच घेरले. अंजनेरीचा पुरावा मागणारे आपण कोण?आणि आपला काय अधिकार आहे अशी टोकाची चर्चा होऊ लागल्याने गोविंदानंदानाच आपली परंपरा आणि आपण कोणत्या आखाड्याचे आहात, असा प्रश्न साधू-महंतांनी केला. त्यावर त्यांनी चर्चा भरकटविण्याचा प्रयत्न केला आणि मूळ मुद्दा सोडून दिल्याने गोंधळ अधिकच वाढला. या गोंधळातच गेाविंदानंद आणि आपले गुरू द्वारकापीठाधिश्वर शंकराचार्य यांचा उल्लेख करतानाच महंत सुधीरदास यांनी शंकाराचार्य काँग्रेसधार्जिणे असल्याचा उल्लेख करताच गोविंदानंद भडकले आणि वादाच्या आखाड्यातच सारेच उतरले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम