शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

बसेस वेळेवर धावत नसल्याने असंतोष

By admin | Updated: April 7, 2017 23:28 IST

नांदगाव : आगारातून सुटणाऱ्या बसेस वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष वाढत आहे.

 नांदगाव : आगारातून सुटणाऱ्या बसेस वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष वाढत आहे. बस रद्द होणे, उशिराने सुटणे यामुळे बसचा प्रवासीवर्ग खासगी वाहतुकीकडे वळत असल्याचा आर्थिक फटका परिवहन महामंडळाला बसत आहे. त्या स्पर्धेला तोंड देताना, दिवसेंदिवस तोट्याकडे प्रवास सुरू असल्याने नांदगाव आगार बंद करण्याची पत्रं येथील व्यवस्थापनाला येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. लांब पल्ल्याच्या नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी त्यामुळे दूरच राहिली. वरील सर्व दुरवस्थांचे मूळ व्यवस्थापनाकडे असले तरी येथे असलेली कर्मचारीसंख्यासुद्धा यास कारणीभूत आहे. ११२ वाहकांची गरज असताना ९७च वाहक आहेत. लिपिकांची संख्या कमी असल्याने यातले सात वाहक लिपिकाची कामे करतात. तीन वरिष्ठ लिपिकांपैकी एकही लिपिक येथे नाही. ११ कनिष्ठ लिपिक हवे असताना येथे केवळ सहाच लिपिक आहेत. वाहतूक नियंत्रकाच्या पाच जागा खाली आहेत. फक्त दोनच नियंत्रक वाहतुकीचे नियोजन करतात. तीनपैकी एकच पर्यवेक्षक कार्यरत आहे. कार्यशाळेत ५१ कर्मचारी आवश्यक असताना फक्त ४१ कर्मचारी आहेत. त्यातले दोन लिपिकाचे काम करतात. रस्त्यावर कायम नादुरु स्त होणाऱ्या व जुन्या बसेसवर अवलंबून असलेल्या नांदगाव आगाराला कोणी वालीच नाही, अशी स्थिती आहे. मध्यंतरी स्पेअर पार्ट्सचा तुटवडा होता. अलीकडे थोडी सुधारणा झाली असली तरी मनुष्यबळ कमी. त्याची भरपाई कशी करणार हा प्रश्न आहे. वरिष्ठ स्तरावर नवीन भरती सुरू झाली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक गुलाब बच्छाव यांनी दिली. ते व्हायचे तेव्हा होईल प्रवाशांनी तोपर्यंत बसथांब्यावर थांबून राहायचे का, असा सवाल प्रवासी संघटनेचे विलास साळुंके यांनी केला आहे. (वार्ताहर)