शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बसेस वेळेवर धावत नसल्याने असंतोष

By admin | Updated: April 7, 2017 23:28 IST

नांदगाव : आगारातून सुटणाऱ्या बसेस वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष वाढत आहे.

 नांदगाव : आगारातून सुटणाऱ्या बसेस वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष वाढत आहे. बस रद्द होणे, उशिराने सुटणे यामुळे बसचा प्रवासीवर्ग खासगी वाहतुकीकडे वळत असल्याचा आर्थिक फटका परिवहन महामंडळाला बसत आहे. त्या स्पर्धेला तोंड देताना, दिवसेंदिवस तोट्याकडे प्रवास सुरू असल्याने नांदगाव आगार बंद करण्याची पत्रं येथील व्यवस्थापनाला येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. लांब पल्ल्याच्या नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी त्यामुळे दूरच राहिली. वरील सर्व दुरवस्थांचे मूळ व्यवस्थापनाकडे असले तरी येथे असलेली कर्मचारीसंख्यासुद्धा यास कारणीभूत आहे. ११२ वाहकांची गरज असताना ९७च वाहक आहेत. लिपिकांची संख्या कमी असल्याने यातले सात वाहक लिपिकाची कामे करतात. तीन वरिष्ठ लिपिकांपैकी एकही लिपिक येथे नाही. ११ कनिष्ठ लिपिक हवे असताना येथे केवळ सहाच लिपिक आहेत. वाहतूक नियंत्रकाच्या पाच जागा खाली आहेत. फक्त दोनच नियंत्रक वाहतुकीचे नियोजन करतात. तीनपैकी एकच पर्यवेक्षक कार्यरत आहे. कार्यशाळेत ५१ कर्मचारी आवश्यक असताना फक्त ४१ कर्मचारी आहेत. त्यातले दोन लिपिकाचे काम करतात. रस्त्यावर कायम नादुरु स्त होणाऱ्या व जुन्या बसेसवर अवलंबून असलेल्या नांदगाव आगाराला कोणी वालीच नाही, अशी स्थिती आहे. मध्यंतरी स्पेअर पार्ट्सचा तुटवडा होता. अलीकडे थोडी सुधारणा झाली असली तरी मनुष्यबळ कमी. त्याची भरपाई कशी करणार हा प्रश्न आहे. वरिष्ठ स्तरावर नवीन भरती सुरू झाली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक गुलाब बच्छाव यांनी दिली. ते व्हायचे तेव्हा होईल प्रवाशांनी तोपर्यंत बसथांब्यावर थांबून राहायचे का, असा सवाल प्रवासी संघटनेचे विलास साळुंके यांनी केला आहे. (वार्ताहर)