शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बसेस वेळेवर धावत नसल्याने असंतोष

By admin | Updated: April 7, 2017 23:28 IST

नांदगाव : आगारातून सुटणाऱ्या बसेस वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष वाढत आहे.

 नांदगाव : आगारातून सुटणाऱ्या बसेस वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष वाढत आहे. बस रद्द होणे, उशिराने सुटणे यामुळे बसचा प्रवासीवर्ग खासगी वाहतुकीकडे वळत असल्याचा आर्थिक फटका परिवहन महामंडळाला बसत आहे. त्या स्पर्धेला तोंड देताना, दिवसेंदिवस तोट्याकडे प्रवास सुरू असल्याने नांदगाव आगार बंद करण्याची पत्रं येथील व्यवस्थापनाला येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. लांब पल्ल्याच्या नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी त्यामुळे दूरच राहिली. वरील सर्व दुरवस्थांचे मूळ व्यवस्थापनाकडे असले तरी येथे असलेली कर्मचारीसंख्यासुद्धा यास कारणीभूत आहे. ११२ वाहकांची गरज असताना ९७च वाहक आहेत. लिपिकांची संख्या कमी असल्याने यातले सात वाहक लिपिकाची कामे करतात. तीन वरिष्ठ लिपिकांपैकी एकही लिपिक येथे नाही. ११ कनिष्ठ लिपिक हवे असताना येथे केवळ सहाच लिपिक आहेत. वाहतूक नियंत्रकाच्या पाच जागा खाली आहेत. फक्त दोनच नियंत्रक वाहतुकीचे नियोजन करतात. तीनपैकी एकच पर्यवेक्षक कार्यरत आहे. कार्यशाळेत ५१ कर्मचारी आवश्यक असताना फक्त ४१ कर्मचारी आहेत. त्यातले दोन लिपिकाचे काम करतात. रस्त्यावर कायम नादुरु स्त होणाऱ्या व जुन्या बसेसवर अवलंबून असलेल्या नांदगाव आगाराला कोणी वालीच नाही, अशी स्थिती आहे. मध्यंतरी स्पेअर पार्ट्सचा तुटवडा होता. अलीकडे थोडी सुधारणा झाली असली तरी मनुष्यबळ कमी. त्याची भरपाई कशी करणार हा प्रश्न आहे. वरिष्ठ स्तरावर नवीन भरती सुरू झाली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक गुलाब बच्छाव यांनी दिली. ते व्हायचे तेव्हा होईल प्रवाशांनी तोपर्यंत बसथांब्यावर थांबून राहायचे का, असा सवाल प्रवासी संघटनेचे विलास साळुंके यांनी केला आहे. (वार्ताहर)