शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

मजुरांचे विदारक पद्धतीने स्थलांतर सरकारला अशोभनीय : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:49 IST

नाशिक : लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेले मजूर हे पायपीट करीत आणि जमेल त्या पद्धतीने आपल्या गावाकडे जात आहेत. याविषयी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीचे स्थलांतर हे सरकारला अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे.

नाशिक : लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेले मजूर हे पायपीट करीत आणि जमेल त्या पद्धतीने आपल्या गावाकडे जात आहेत. याविषयी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीचे स्थलांतर हे सरकारला अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे. आपण कोणावर टीका करत नाही. मात्र, त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा देणे आवश्यक असल्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. लॉकडाउन हाच कोरोनाच्या विरोधातील अंतिम उपाय नाही. कारण त्यामुळे आता मुंबईसह अन्यत्र उद्योग धंदे सुरू होणारच नाही या समजातून ते निघाले आहेत, असेही मत भुजबळ यांनी व्यक्त केले.गुरुवारी (दि.७) प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. मुळातच पंतप्रधानांनी एका रात्रीत लॉकडाउन जाहीर करणे चुकीचे होते. किमान दोन ते तीन दिवस वेळ दिला असता तर कामगारांना आपल्या गावी जाता आले असते आणि उद्योग व्यावसायिकांनादेखील आश्वस्त करता आले असते, परंतु एकाएकी हा निर्णय जाहीर करण्यात आला, अशी केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. राज्यातील कामगार आणि मजूर हवालदिल झाले आहेत. त्यांना आता घराची ओढ लागली असल्याने ते घराकडे निघाले आहेत. त्यांना राज्यात किंवा परराज्यात जाण्यासाठी सोय करून दिली असती तर योग्य ठरले असते. आज बस किंवा अन्य साधने नसल्याने ते पायी जाताना अनेक गावांत थांबतात, भोजन करून पुन्हा निघतात, त्यामुळे संसर्ग वाढू शकत नाही काय असा प्रश्न करीत भुजबळ यांनी आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयाला वाचा फोडली होती, असेही सांगितले.राज्यातून अशाप्रकारे जाणारे मजूर हे भलेही या राज्याचे नागरिक नसले तरी देशाचे तर नागरिक आहेत ना, मग त्यांची जबाबदारी कशी टाळता येईल, असा प्रश्न त्यांनी केला. वारंवार बदलणाऱ्या आदेशांमुळे गोंधळाचे वातावरण आहे, असे सांगतानाच त्यांनी कोरोनाच्या विरोधात सर्वांनी एकत्रित लढायचे आहे, असेही सांगितले.-------------शासकीय अधिकाऱ्यांतील विसंवादशासकीय अधिका-यांमध्ये असलेल्या विसंवादावर टीका करताना भुजबळ यांनी जिल्हाधिकारी दुकाने उघडी करण्यास सांगतात आणि पोलीस दुकाने बंद करायला सांगतात हे बरोबर नाही. वेळेची मर्यादा दुकानांना देणे म्हणजे गर्दी करण्यास निमंत्रण देण्यासारखे आहे. ही संचारबंदी आजाराच्या विरोधात आहे, जातीय दंगलीसाठी नाही असे सांगून त्यांनी प्रशासकीय घोळाबद्दल नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिक