शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

मजुरांचे विदारक पद्धतीने स्थलांतर सरकारला अशोभनीय : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:49 IST

नाशिक : लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेले मजूर हे पायपीट करीत आणि जमेल त्या पद्धतीने आपल्या गावाकडे जात आहेत. याविषयी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीचे स्थलांतर हे सरकारला अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे.

नाशिक : लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेले मजूर हे पायपीट करीत आणि जमेल त्या पद्धतीने आपल्या गावाकडे जात आहेत. याविषयी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीचे स्थलांतर हे सरकारला अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे. आपण कोणावर टीका करत नाही. मात्र, त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा देणे आवश्यक असल्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. लॉकडाउन हाच कोरोनाच्या विरोधातील अंतिम उपाय नाही. कारण त्यामुळे आता मुंबईसह अन्यत्र उद्योग धंदे सुरू होणारच नाही या समजातून ते निघाले आहेत, असेही मत भुजबळ यांनी व्यक्त केले.गुरुवारी (दि.७) प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. मुळातच पंतप्रधानांनी एका रात्रीत लॉकडाउन जाहीर करणे चुकीचे होते. किमान दोन ते तीन दिवस वेळ दिला असता तर कामगारांना आपल्या गावी जाता आले असते आणि उद्योग व्यावसायिकांनादेखील आश्वस्त करता आले असते, परंतु एकाएकी हा निर्णय जाहीर करण्यात आला, अशी केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. राज्यातील कामगार आणि मजूर हवालदिल झाले आहेत. त्यांना आता घराची ओढ लागली असल्याने ते घराकडे निघाले आहेत. त्यांना राज्यात किंवा परराज्यात जाण्यासाठी सोय करून दिली असती तर योग्य ठरले असते. आज बस किंवा अन्य साधने नसल्याने ते पायी जाताना अनेक गावांत थांबतात, भोजन करून पुन्हा निघतात, त्यामुळे संसर्ग वाढू शकत नाही काय असा प्रश्न करीत भुजबळ यांनी आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयाला वाचा फोडली होती, असेही सांगितले.राज्यातून अशाप्रकारे जाणारे मजूर हे भलेही या राज्याचे नागरिक नसले तरी देशाचे तर नागरिक आहेत ना, मग त्यांची जबाबदारी कशी टाळता येईल, असा प्रश्न त्यांनी केला. वारंवार बदलणाऱ्या आदेशांमुळे गोंधळाचे वातावरण आहे, असे सांगतानाच त्यांनी कोरोनाच्या विरोधात सर्वांनी एकत्रित लढायचे आहे, असेही सांगितले.-------------शासकीय अधिकाऱ्यांतील विसंवादशासकीय अधिका-यांमध्ये असलेल्या विसंवादावर टीका करताना भुजबळ यांनी जिल्हाधिकारी दुकाने उघडी करण्यास सांगतात आणि पोलीस दुकाने बंद करायला सांगतात हे बरोबर नाही. वेळेची मर्यादा दुकानांना देणे म्हणजे गर्दी करण्यास निमंत्रण देण्यासारखे आहे. ही संचारबंदी आजाराच्या विरोधात आहे, जातीय दंगलीसाठी नाही असे सांगून त्यांनी प्रशासकीय घोळाबद्दल नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिक