शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

‘ग्रामीण विकासाची संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:58 IST

सिन्नर महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने’ विषयावरील राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन करण्यात आले.

सिन्नर : ग्रामीण भागातील नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून असून त्यांच्यात प्रचंड निराशा आहे. शासकीय व अशासकीय संस्थांनी पुढाकार घेवून ग्रामीण भागात शाश्वत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मविप्रचे इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खताळे यांनी केले.सिन्नर महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने’ विषयावरील राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन खताळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर डॉ. एस. बी. श्रीवास्तव, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, एस. के. गायकवाड, डॉ. पगार आदी उपस्थित होते. विकास ही फक्त शहरी भागाची मक्तेदारी नसून शासन, शैक्षणिक संस्था अशासकीय संघटना आणि स्वयं मदत संघ यांनी ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक आहे असे मत प्राचार्य डॉ. शिंदे यांनी प्रास्तविकात व्यक्त केले. स्वार्थीच्या पलिकडे जाऊन समस्येच्या मुळाशी जाण्याची तयारी आसल्यास ग्रामीण विकास शक्य आहे असे प्रतिपादन डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ग्रामीण भागातील असंतोष दर्शवितात असेही ते म्हणाले. चर्चास्त्राच्या उद्घाटन बिजभाषणात ते बोलत होते. जलसंधारण, आरोग्य यासारख्या मुलभूत सुविधांबरोबरच शेतीतील नवनवीन तंत्राचा वापर आणि स्पर्धात्मक बाजारपेठा केल्यास ग्रामीण विकास निश्चित होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. योगेश भारस्कार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष दळवी यांनी आभार मानले. 

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय