शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

‘ग्रामीण विकासाची संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:58 IST

सिन्नर महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने’ विषयावरील राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन करण्यात आले.

सिन्नर : ग्रामीण भागातील नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून असून त्यांच्यात प्रचंड निराशा आहे. शासकीय व अशासकीय संस्थांनी पुढाकार घेवून ग्रामीण भागात शाश्वत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मविप्रचे इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खताळे यांनी केले.सिन्नर महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने’ विषयावरील राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन खताळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर डॉ. एस. बी. श्रीवास्तव, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, एस. के. गायकवाड, डॉ. पगार आदी उपस्थित होते. विकास ही फक्त शहरी भागाची मक्तेदारी नसून शासन, शैक्षणिक संस्था अशासकीय संघटना आणि स्वयं मदत संघ यांनी ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक आहे असे मत प्राचार्य डॉ. शिंदे यांनी प्रास्तविकात व्यक्त केले. स्वार्थीच्या पलिकडे जाऊन समस्येच्या मुळाशी जाण्याची तयारी आसल्यास ग्रामीण विकास शक्य आहे असे प्रतिपादन डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ग्रामीण भागातील असंतोष दर्शवितात असेही ते म्हणाले. चर्चास्त्राच्या उद्घाटन बिजभाषणात ते बोलत होते. जलसंधारण, आरोग्य यासारख्या मुलभूत सुविधांबरोबरच शेतीतील नवनवीन तंत्राचा वापर आणि स्पर्धात्मक बाजारपेठा केल्यास ग्रामीण विकास निश्चित होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. योगेश भारस्कार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष दळवी यांनी आभार मानले. 

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय