शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

समृद्धी मूल्यांकन बैठकीत तिढा सोडविण्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 01:31 IST

समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली.

नाशिक : समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सोमवारी समृद्धी महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ‘टास्क फोर्सची‘ची बैठक बोलविली होती. यावेळी त्यांनी महामार्ग कामाची प्रगती व अडथळे याचा आढावा घेण्यात आला. समृद्धी महामार्गातील अडचणी समजावून घेण्याबरोबरच कोणत्या मुद्द्यावर शेतकºयांशी संवाद साधून यातून मार्ग काढता येऊ शकेल याबाबत अधिकाºयांशी चर्चा केली. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढला जाईलच शिवाय यापूर्वी हस्तांतरण करण्यात आलेल्या, परंतु अद्यापही शेतकºयांच्या ताब्यातच असलेल्या जमिनी मिळविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे.सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील मºहळ बुद्रूक, खंबाळे, पिंगळगाव डुकरा, डुसंगवाडी येथील जमिनीच्या भूसंपादनाचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. सदर जमिनी पाटबंधारे विभागाने यापूर्वीच संपादित केलेल्या आहेत, त्यांचा मोबदला शेतकºयांना देण्यात आलेला आहे, मात्र त्यांची मालकी अद्यापही शेतकºयांकडेच आहे. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी प्रारंभी शेतकºयांना नोटिसादेखील देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.हस्तांतरित जमिनी देण्याबाबत होणारा विरोध कमी करण्यासाठी शेतकºयांशीदेखील चर्चा केली जाणार आहे. शेतकºयांकडून होणाºया विरोधामुळे काही ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम खोळंबले आहे, मात्र आता हे काम मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिलेजाईल यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. बैठकीत महामार्गाच्या कामासाठी पाणी उपलब्धता, गौण खनीज परवानग्या व इतर आवश्यक परवाने याबाबत आढावा घेतला गेला.जेथे गरज तेथे होणार गाळ उपसाछोटे बंधारे, धरण तलावातील गाळ काढण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा आढावादेखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी ठेकेदार करीत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली असता ठेकेदार हे आपल्या सोयीने गाळ काढण्याचे काम करतात. मात्र त्यातून अपेक्षित काम होताना दिसत नाही. ज्या ठिकाणी गाळ काढल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता वाढू शकते अशी यादी ठेकेदारांना दिली जाणार असून, त्यानुसारच ठेकेदारांनी गाळ काढणे अपेक्षित आहे. या संदर्भातील सूचना ठेकेदारांनादेखील दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय