शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी मूल्यांकन बैठकीत तिढा सोडविण्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 01:31 IST

समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली.

नाशिक : समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सोमवारी समृद्धी महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ‘टास्क फोर्सची‘ची बैठक बोलविली होती. यावेळी त्यांनी महामार्ग कामाची प्रगती व अडथळे याचा आढावा घेण्यात आला. समृद्धी महामार्गातील अडचणी समजावून घेण्याबरोबरच कोणत्या मुद्द्यावर शेतकºयांशी संवाद साधून यातून मार्ग काढता येऊ शकेल याबाबत अधिकाºयांशी चर्चा केली. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढला जाईलच शिवाय यापूर्वी हस्तांतरण करण्यात आलेल्या, परंतु अद्यापही शेतकºयांच्या ताब्यातच असलेल्या जमिनी मिळविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे.सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील मºहळ बुद्रूक, खंबाळे, पिंगळगाव डुकरा, डुसंगवाडी येथील जमिनीच्या भूसंपादनाचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. सदर जमिनी पाटबंधारे विभागाने यापूर्वीच संपादित केलेल्या आहेत, त्यांचा मोबदला शेतकºयांना देण्यात आलेला आहे, मात्र त्यांची मालकी अद्यापही शेतकºयांकडेच आहे. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी प्रारंभी शेतकºयांना नोटिसादेखील देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.हस्तांतरित जमिनी देण्याबाबत होणारा विरोध कमी करण्यासाठी शेतकºयांशीदेखील चर्चा केली जाणार आहे. शेतकºयांकडून होणाºया विरोधामुळे काही ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम खोळंबले आहे, मात्र आता हे काम मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिलेजाईल यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. बैठकीत महामार्गाच्या कामासाठी पाणी उपलब्धता, गौण खनीज परवानग्या व इतर आवश्यक परवाने याबाबत आढावा घेतला गेला.जेथे गरज तेथे होणार गाळ उपसाछोटे बंधारे, धरण तलावातील गाळ काढण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा आढावादेखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी ठेकेदार करीत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली असता ठेकेदार हे आपल्या सोयीने गाळ काढण्याचे काम करतात. मात्र त्यातून अपेक्षित काम होताना दिसत नाही. ज्या ठिकाणी गाळ काढल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता वाढू शकते अशी यादी ठेकेदारांना दिली जाणार असून, त्यानुसारच ठेकेदारांनी गाळ काढणे अपेक्षित आहे. या संदर्भातील सूचना ठेकेदारांनादेखील दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय