शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

गंगापूर धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:47 IST

नाशिक : मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असल्यामुळे पाणी वाटपाच्या समान न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व नगर जिल्ह्यातील मुठा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा होत असलेल्या आग्रहावर सोमवारी औरंगाबादेत झालेल्या मराठवाडा-गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक होऊन त्यात गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर चर्चा झाली. नगर जिल्ह्णातून पाणी सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून या बैठकीवर दबाव टाकण्यासाठी नगर जिल्ह्यातील पुढारी व लोकप्रतिनिधींनी बैठकीला हजेरी लावली.

ठळक मुद्देपाणी सोडण्यावर खल : नगरकरांचा पाणी देण्यास विरोध

नाशिक : मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असल्यामुळे पाणी वाटपाच्या समान न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व नगर जिल्ह्यातील मुठा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा होत असलेल्या आग्रहावर सोमवारी औरंगाबादेत झालेल्या मराठवाडा-गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक होऊन त्यात गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर चर्चा झाली. नगर जिल्ह्णातून पाणी सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून या बैठकीवर दबाव टाकण्यासाठी नगर जिल्ह्यातील पुढारी व लोकप्रतिनिधींनी बैठकीला हजेरी लावली.सन २०१५ मध्ये अशाच प्रकारे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी सरकारवर दबाव टाकून नाशिक व नगर जिल्ह्णातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याची वेळ आली होती. नाशिकच्या गंगापूर तर नगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण होऊन परिणामी सत्ताधाºयांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. (पान ८ वर)यंदाही मराठवाड्यावर पावसाने अवकृपा केल्यामुळे जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असून, समान पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीला आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध ठेवण्यासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्याचे संकेत दिले जात आहे. नाशिक दौºयावर आलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्या संदर्भातील सुतोवाच केल्याने त्यापार्श्वभूमीवर सोमवारी औरंगाबाद येथे मराठवाडा-गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक झाली.या बैठकीत नाशिक जिल्ह्णातील पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी जिल्ह्णातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या व विशेष करून गंगापूर, दारणा धरणातील पाण्याची आकडेवारी सादर केली. त्यात या पाण्यावर असलेल्या विविध संस्था, योजनांच्या आरक्षणाचीही माहिती देण्यात आली. पावसाळ्यात नाशिक जिल्ह्णातून जायकवाडीसाठी सुमारे २१ टीएमसी पाणी पोहोचल्याची माहिती यावेळी देण्यात आली, तर जायकवाडीचा मृतसाठा तसेच खरिपासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा विचार करता, नाशिक व नगरमधून जेमतेत चार टीएमसी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला. बैठकीत ठोस निर्णय नाहीया बैठकीत पाणी सोडण्याचा ठोस निर्णय घेण्यात आलेला नसला तरी, नाशिकच्या अधिकाºयांनी जी काही आकडेवारी सादर केली त्याचा अभ्यास केला जाणार असल्याचे पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग जमलेले असताना जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर मराठवाड्याने डोळा ठेवला असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मात्र डोळ्यावर झापडे बांधले असून, सोमवारच्या बैठकीत नगर जिल्ह्यातील पुढाºयांनी उपस्थित राहून पाणी देण्याला विरोध केल्याचे सांगण्यात आले.