शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

गंगापूर धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:47 IST

नाशिक : मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असल्यामुळे पाणी वाटपाच्या समान न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व नगर जिल्ह्यातील मुठा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा होत असलेल्या आग्रहावर सोमवारी औरंगाबादेत झालेल्या मराठवाडा-गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक होऊन त्यात गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर चर्चा झाली. नगर जिल्ह्णातून पाणी सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून या बैठकीवर दबाव टाकण्यासाठी नगर जिल्ह्यातील पुढारी व लोकप्रतिनिधींनी बैठकीला हजेरी लावली.

ठळक मुद्देपाणी सोडण्यावर खल : नगरकरांचा पाणी देण्यास विरोध

नाशिक : मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असल्यामुळे पाणी वाटपाच्या समान न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व नगर जिल्ह्यातील मुठा, निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा होत असलेल्या आग्रहावर सोमवारी औरंगाबादेत झालेल्या मराठवाडा-गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक होऊन त्यात गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर चर्चा झाली. नगर जिल्ह्णातून पाणी सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून या बैठकीवर दबाव टाकण्यासाठी नगर जिल्ह्यातील पुढारी व लोकप्रतिनिधींनी बैठकीला हजेरी लावली.सन २०१५ मध्ये अशाच प्रकारे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी सरकारवर दबाव टाकून नाशिक व नगर जिल्ह्णातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याची वेळ आली होती. नाशिकच्या गंगापूर तर नगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण होऊन परिणामी सत्ताधाºयांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. (पान ८ वर)यंदाही मराठवाड्यावर पावसाने अवकृपा केल्यामुळे जायकवाडी धरणात ३८ टक्केच जलसाठा असून, समान पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीला आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध ठेवण्यासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्याचे संकेत दिले जात आहे. नाशिक दौºयावर आलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी त्या संदर्भातील सुतोवाच केल्याने त्यापार्श्वभूमीवर सोमवारी औरंगाबाद येथे मराठवाडा-गोदावरी पाटबंधारे विभागाची बैठक झाली.या बैठकीत नाशिक जिल्ह्णातील पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी जिल्ह्णातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या व विशेष करून गंगापूर, दारणा धरणातील पाण्याची आकडेवारी सादर केली. त्यात या पाण्यावर असलेल्या विविध संस्था, योजनांच्या आरक्षणाचीही माहिती देण्यात आली. पावसाळ्यात नाशिक जिल्ह्णातून जायकवाडीसाठी सुमारे २१ टीएमसी पाणी पोहोचल्याची माहिती यावेळी देण्यात आली, तर जायकवाडीचा मृतसाठा तसेच खरिपासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा विचार करता, नाशिक व नगरमधून जेमतेत चार टीएमसी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला. बैठकीत ठोस निर्णय नाहीया बैठकीत पाणी सोडण्याचा ठोस निर्णय घेण्यात आलेला नसला तरी, नाशिकच्या अधिकाºयांनी जी काही आकडेवारी सादर केली त्याचा अभ्यास केला जाणार असल्याचे पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग जमलेले असताना जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर मराठवाड्याने डोळा ठेवला असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मात्र डोळ्यावर झापडे बांधले असून, सोमवारच्या बैठकीत नगर जिल्ह्यातील पुढाºयांनी उपस्थित राहून पाणी देण्याला विरोध केल्याचे सांगण्यात आले.