शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ग्रामपंचायत निवडणूकांची सोशल मीडियावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 18:52 IST

चांदोरी : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा केल्यापासून गोदाकाठ परिसरातील गावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील चावडीवर मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. आता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, त्या चर्चा नॉनस्टॉप रंगू लागल्या आहेत. युवापिढीने तर सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीला केवळ १८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कोरोना संक्रमणाची खबरदारी म्हणून या निवडणुका लांबविण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व अधिकारात झालेली वाढ बघता, अनेकांना राजकारण खुणावू लागले आहे. युवावर्गही मोठ्या प्रमाणात याकडे आकृष्ट होऊ लागला आहे. युवकांच्या सहभागाने अनेकांची एकाधिकारशाही आता संपुष्टात येणार असल्याचे दिसते. गेल्या काही काळापासून नागरिकांमध्ये आता जागरूकता आलेली आहे, तरीही त्यांना निवडणुका जिंकणे कठीण झाले आहे. कार्यकर्ते पोसणे, निवडणुकीतील अपार खर्च यामुळे एखादा गरीब नेता नेतृत्वगुण असूनही निवडून येणे कठीण आहे. मात्र, शेवटी मतदार ठरवतील तोच नेता निवडून येईल, हे जरी खरे असले, तरी सत्तास्थापनेच्या वेळी पडद्याआड अनेक राजकीय घडामोडी असतात. मतदारांनी दिलेला कौल डावलून सत्ता स्थापन केली जाते. अशी अनेक उदाहरणे आहेत. यामुळे गुलाबी थंडीत याशिवाय दुसरी चर्चा ग्रामीण भागात होताना दिसत नाही.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत