शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

मद्य परवान्यात सवलत, शाळा मान्यता महाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:25 IST

नाशिक- कोरोना काळात पालक मेटाकुटीला आले खरे; परंतु त्याचा प्रतिकूल परीणाम शाळांवरदेखील झाला आहे. मात्र असे असताना राज्य शासनाने ...

नाशिक- कोरोना काळात पालक मेटाकुटीला आले खरे; परंतु त्याचा प्रतिकूल परीणाम शाळांवरदेखील झाला आहे. मात्र असे असताना राज्य शासनाने चालू वर्षी स्वयंअर्थसहयित नवीन शाळा मान्यतेसाठी वीस हजारांवरून दीड लाख असे शुल्क वाढवले असून शाळेचा दर्जावाढ, अतिरिक्त तुकडी वाढवणे, नवीन वर्ग जोडणे या सर्वांसाठीच मोठ्या प्रमाणात शुल्क वाढ केली आहे.

पालक शुल्क भरत नसल्याने अनेक शाळांसमोरच आता आर्थिक संकट उभे असताना शासनाच्या निर्णयामुळे वाढीव भुर्दंड तर बसणार आहे. परंतु कोरोना काळात मद्य परवाना शुल्कात सुमारे तीस टक्के सूट देणाऱ्या शासनाने शिक्षण संस्थांना मात्र शुल्क वाढवून दिल्याने शैक्षणिक क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्य शासनाने अलीकडेच काढलेल्या आदेशानुसार नवीन अर्थसहाय्यता नवीन शाळेस महापालिका क्षेत्रात मान्यता देताना दीड लाख रुपये शुल्क केले आहे, अगोदर ते अवघे वीस हजार हाेते. त्याच प्रमाणे ड वर्ग महापालिका क्षेत्र असेल तर ७५ हजार क वर्ग नगरपालिका व सर्व ग्रामपंचायत क्षेत्र ५० हजार रुपये असे नवीन शुल्क आहेत. याशिवाय विद्यमान शाळेचा स्वयंअर्थसहाय्यित दर्जा वाढ, कनिष्ठ महाविद्यालयात अतिरिक्त शाखा जोडणे, अतिरिक्त जादा तुकडी, इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग जोडणे तसे शाळा हस्तांतर शुल्कदेखील वाढवण्यात आले आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे शाळा- कनिष्ठ महाविद्यालये बंद होती. त्यातच शासनाने पालकांना शुल्क भरण्यास सक्ती करू नये, असे आदेश दिल्यानंतर सधन पालक देखील शुल्क भरण्यास टाळाटाळ करतात. मात्र, दुसरीकडे शाळांना अन्य खर्चाला सामोरे जावेच लागते आहे. शिक्षकांचे वेतन देखील द्यावे लागते, अशावेळी नेमकी अशा आर्थिक संकटाच्या वेळीच शाळा संदर्भातील अशा प्रकारच्या शुल्कवाढीची गरज होती काय, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इन्फो...

विद्यमान शाळेची दर्जावाढ ही महापालिका आणि नगरपालिकेच्या दर्जानुसार आहे. कनिष्ठ महाविद्यालयास अतिरिक्त शाखा जोडणे, इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग जोडणे आणि शाळा हस्तांतर या सर्व कामकाजासाठी शुल्क वाढवण्यात आले असून दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत शुल्क वाढवण्यात आले आहे.

कोट...

कोरोना काळामुळे शाळांची फी वसूल होत नाही. त्यामुळे शिक्षकांचे वेतन देता येत नाही अन्य बांधिल खर्च करता येत नाही. त्यामुळे मुळातच पालक, शिक्षक आणि संस्था चालक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे अशावेळी अशी दरवाढ कितपत योग्य याचा विचार शासनाने करावा. फी वाढ करायची तर दहा टक्क्यांच्या आत करावी, अशी मर्यादा आहे, मग शासनाला शुल्क वाढीसाठी मर्यादा नाही काय?

मनोज पिंगळे, अध्यक्ष,रवींद्र विद्या प्रसारक मंडळ, नाशिक