शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

‘साईड ब्रँच’च्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असंतोष

By admin | Updated: January 31, 2016 23:13 IST

महासंचालकांकडे तक्रार : जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोप

नाशिक : पोलीस खात्यात यापूर्वी साईड ब्रँच काम केल्यानंतर शहर पोलीस आयुक्तालयात बदली झाल्यानंतर पुन्हा साईड ब्रँचला फेकण्यात आल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे़ पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याची भावना या अधिकाऱ्यांमध्ये असून, त्यातील काहींनी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्यांची वेळ मागून घेतल्याचे वृत्त आहे़पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी अपमानास्पद वागणूक व आर्थिक निकषांवर बदल्या केल्या जात असल्याचे साईड ब्रँचमधील अधिकारी उघडपणे बोलू लागले आहेत़ तसेच यापूर्वीही आम्ही पोलीस ठाणी सांभाळली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभिप्रेत असलेली वसुली आम्हीदेखील करून देऊ शकतो, असे स्पष्टपणे सांगत असून, यातील काहींनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पत्रव्यवहारही केला आहे़ सिंहस्थानंतर पोलीस आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये पंचवटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शांताराम अवसारे यांनी विशेष शाखेत, तर विशेष शाखेतील प्रकाश सपकाळे यांची पंचवटी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली़ तसेच शहरात नव्याने स्थापन झालेल्या मुंबई नाका व म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बाजीराव महाजन व नरेंद्र पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली़सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाचक शाखेत, तर त्यांच्या जागेवर पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातून बदलून आलेले पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली़ पोलीस आयुक्तांनी या बदल्यांमध्ये साईड ब्रँचमधील पोलीस अधिकाऱ्यांचा विचारच न केल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण आहे़ विशेष म्हणजे सद्यस्थितीत साईड ब्रँचमध्ये कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा कारभारही सांभाळलेला आहे़ (प्रतिनिधी)