शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 15:06 IST

नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीवरील भोजापूर धरण शनिवार (दि.15) आँगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. अवघ्या तीन दिवसातच धरणात पन्नास टक्के पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे 539 क्यूसेक पाणी सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देभोजापूर धरण ओव्हरफ्लो : अवघ्या तीन दिवसात पन्नास टक्के पाण्याची आवक

नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीवरील भोजापूर धरण शनिवार (दि.15) आँगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. अवघ्या तीन दिवसातच धरणात पन्नास टक्के पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे 539 क्यूसेक पाणी सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यापासून पावसाचे माहेरघर असलेल्या पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तालुक्यातील धरणात अल्प प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता. पंरतु गेल्या गुरुवारपासून जोरदार पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदीला पूर आला आहे. ठाणगाव जवळील उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे म्हाळुंगी नदीला पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात 10 आँगस्टपासून पाणी येण्यास सुरुवात झाली होती. अवघ्या पाच दिवसात धरणात 70 टक्के पाण्याची आवक झाल्याने 361 दशलक्ष घनफूट क्षमतेचे भोजापूर धरण शनिवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर सुरुच असल्याने म्हांंळुगी नदीद्वारे धरणात दररोज 500 ते 600 क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मनेगावसह 16 गावे व कणकोरीसह 5 गावे नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर नांदूरशिंगोटे व परिसराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने म्हांंळुगी नदीजवळील बंधाऱ्यात पाणी पोहोचले आहे. दरवर्षी लाभक्षेत्रातील शेतकरी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची वाट पाहत असतात. नेहमी आँगस्ट महिन्याच्या मध्यवर्ती भोजापूर धरण भरण्याचा इतिहास आहे. पंरतु यावर्षी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते तर नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात होते. दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. पावसाच्या पाण्याने बंधारे भरल्याने जामनदीचे पाणी पांगरी शिवाराच्या परिसरात पोहचले आहेत. नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र पाण्याच पाणी असल्याने अद्याप धरणाचे पाणी सोडण्याची मागणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरण पूर्णपणे भरले असून सांडव्यातून पडणारे पाणी. 

 

टॅग्स :WaterपाणीDamधरण