शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 15:06 IST

नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीवरील भोजापूर धरण शनिवार (दि.15) आँगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. अवघ्या तीन दिवसातच धरणात पन्नास टक्के पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे 539 क्यूसेक पाणी सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देभोजापूर धरण ओव्हरफ्लो : अवघ्या तीन दिवसात पन्नास टक्के पाण्याची आवक

नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हाळुंगी नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदीवरील भोजापूर धरण शनिवार (दि.15) आँगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. अवघ्या तीन दिवसातच धरणात पन्नास टक्के पाण्याची आवक झाली आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे 539 क्यूसेक पाणी सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यापासून पावसाचे माहेरघर असलेल्या पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तालुक्यातील धरणात अल्प प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता. पंरतु गेल्या गुरुवारपासून जोरदार पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदीला पूर आला आहे. ठाणगाव जवळील उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे म्हाळुंगी नदीला पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात 10 आँगस्टपासून पाणी येण्यास सुरुवात झाली होती. अवघ्या पाच दिवसात धरणात 70 टक्के पाण्याची आवक झाल्याने 361 दशलक्ष घनफूट क्षमतेचे भोजापूर धरण शनिवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर सुरुच असल्याने म्हांंळुगी नदीद्वारे धरणात दररोज 500 ते 600 क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मनेगावसह 16 गावे व कणकोरीसह 5 गावे नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर नांदूरशिंगोटे व परिसराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने म्हांंळुगी नदीजवळील बंधाऱ्यात पाणी पोहोचले आहे. दरवर्षी लाभक्षेत्रातील शेतकरी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची वाट पाहत असतात. नेहमी आँगस्ट महिन्याच्या मध्यवर्ती भोजापूर धरण भरण्याचा इतिहास आहे. पंरतु यावर्षी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते तर नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात होते. दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. पावसाच्या पाण्याने बंधारे भरल्याने जामनदीचे पाणी पांगरी शिवाराच्या परिसरात पोहचले आहेत. नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र पाण्याच पाणी असल्याने अद्याप धरणाचे पाणी सोडण्याची मागणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरण पूर्णपणे भरले असून सांडव्यातून पडणारे पाणी. 

 

टॅग्स :WaterपाणीDamधरण