शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

जिल्ह्यातील दहा धरणांतून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:52 IST

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, १६ धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, शिवाय आगामी उन्हाळा सुसह्य होणार आहे. 

ठळक मुद्दे१६ धरणे फुल्ल : आगामी उन्हाळा होणार सुसह्य

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, १६ धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, शिवाय आगामी उन्हाळा सुसह्य होणार आहे. जिल्ह्यात अनेक भागात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाचा धडाका सुरूच असल्याने धरणांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यात जिल्ह्यातील आळंदी, पालखेड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमधमेश्वर, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या,  गिरणा, पुनंद आणि माणिकपुंज या धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. त्यामुळे दारणा धरणातून ५५० क्यूसेक, भावलीतून २६ क्यूसेक तसेच वालदेवीतून १६, कडवातून ४२४, नांदूरमधमेश्वरमधून ३६३२, भोजापूरमधून ११४, चणकापूरमधून ६०, हरणबारीतून ३३, नागासाक्यातून २१२, तर गिरणातून ९२९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये गंगापूर (९७ टक्के), काश्यपी (७५ टक्के), गौतमी गोदावरी (८७ टक्के), करंजवण (९४ टक्के), वाघाड (९९ टक्के), ओझरखेड (९४ टक्के), पुणेगाव (९९ टक्के), मुकणे (८३ टक्के) पाणीसाठा झाला आहे.  जिल्ह्यातील धरणांसह लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सद्य:स्थितीत ९६ टक्के पाणीसाठा आहे, तर गतवर्षी हाच साठा ९८ टक्के होता. यंदा १६ प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे, तर मागील वर्षी आजच्या तारखेला २१ धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा होता. यंदा धरणे फुल्ल झाल्याने सिंचनाचा प्रश्न मिटला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर अनेक भागातील भूजल पातळीत वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक