शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
'महाभारत'मधील कर्णाचा अस्त, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
4
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
5
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
6
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
7
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
8
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
9
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
10
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
11
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
12
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
13
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
14
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
15
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
16
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
17
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
18
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
19
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
20
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

नांदूरमधमेश्वरमधून ९६६७ क्यूसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 16:13 IST

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ ...

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नांदूरमधमेश्वर धरणातून ९६६७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास गोदाकाठ भागातील पूरपरिस्थितीचा धोका टळला आहे.इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यात चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसाच्या माहेरघरी पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. दारणा धरणातून ५५४० आणि गंगापूर धरणातून ३०६८ इतक्या पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात काल दुपारी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली. गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे.----------------------------पुराचा धोका टळलागोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली की सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चाटोरी, चापडगाव, मांजरगाव, काथरगाव, दिंडोरी चास, कोठुरे, गोंडेगाव या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो. सगळीकडे पाणी पसरते आणि शेतातील पिके पाण्याखाली येतात. पाणी काही महिने कमी होत नाही. त्यामुळे हाती आलेले पीक वाया जाते असे अनेक वर्ष सातत्याने घडते. त्यामुळे धरणात साचलेला गाळ काढून गेटची संख्या वाढवणे गरजेचं आहे. म्हणजे पूर पाण्याचा फटका शेतीला बसणार नाही आणि गाव पाण्याखाली येणार नाहीत. गोदाकाठ भागात पाऊस पडत नसल्याने केवळ इतर धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे विसर्ग वेळेत सोडल्याने पुराचा धोका टळला आहे. अन्यथा यंदाचा पहिला पूर गोदाकाठ भागात आला असता असे जाणकार सांगतात.-----गोदावरी नदीच्या पात्रात नांदूरमधमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणाच्या गेटजवळ पाणी कमी जाते. जास्त पाण्याचा फ्लो मागे राहातो. त्यामुळे गोदाकाठला पूरपरिस्थिती निर्माण होते, शेती पाण्यात अनेक महिने राहिल्याने नुकसान होते.- गोकुळ गिते, माजी संचालक, पिंपळगाव बाजार समिती

टॅग्स :Nashikनाशिक