शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

नांदूरमधमेश्वरमधून ९६६७ क्यूसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 16:13 IST

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ ...

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नांदूरमधमेश्वर धरणातून ९६६७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास गोदाकाठ भागातील पूरपरिस्थितीचा धोका टळला आहे.इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यात चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसाच्या माहेरघरी पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. दारणा धरणातून ५५४० आणि गंगापूर धरणातून ३०६८ इतक्या पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात काल दुपारी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली. गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे.----------------------------पुराचा धोका टळलागोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली की सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चाटोरी, चापडगाव, मांजरगाव, काथरगाव, दिंडोरी चास, कोठुरे, गोंडेगाव या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो. सगळीकडे पाणी पसरते आणि शेतातील पिके पाण्याखाली येतात. पाणी काही महिने कमी होत नाही. त्यामुळे हाती आलेले पीक वाया जाते असे अनेक वर्ष सातत्याने घडते. त्यामुळे धरणात साचलेला गाळ काढून गेटची संख्या वाढवणे गरजेचं आहे. म्हणजे पूर पाण्याचा फटका शेतीला बसणार नाही आणि गाव पाण्याखाली येणार नाहीत. गोदाकाठ भागात पाऊस पडत नसल्याने केवळ इतर धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे विसर्ग वेळेत सोडल्याने पुराचा धोका टळला आहे. अन्यथा यंदाचा पहिला पूर गोदाकाठ भागात आला असता असे जाणकार सांगतात.-----गोदावरी नदीच्या पात्रात नांदूरमधमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणाच्या गेटजवळ पाणी कमी जाते. जास्त पाण्याचा फ्लो मागे राहातो. त्यामुळे गोदाकाठला पूरपरिस्थिती निर्माण होते, शेती पाण्यात अनेक महिने राहिल्याने नुकसान होते.- गोकुळ गिते, माजी संचालक, पिंपळगाव बाजार समिती

टॅग्स :Nashikनाशिक