शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST

नाशिक : गंगापूर धरणातील पाणी आवर्तन निश्चित केल्यानुसार, गेल्या शक्रवारपासून रब्बी पिके, तसेच एकलहरे औष्णिक केंद्रासाठी ७०० ते ८०० ...

नाशिक : गंगापूर धरणातील पाणी आवर्तन निश्चित केल्यानुसार, गेल्या शक्रवारपासून रब्बी पिके, तसेच एकलहरे औष्णिक केंद्रासाठी ७०० ते ८०० क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पुढील पंधरा दिवस धरणातून पाणी सोडले जाणार आहे.

गंगापूर धरणातील पाण्याचे नुकतेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरक्षण निशिचत करण्यात आले होते. त्यानुसार, रब्बी हंगामातील पिके, तसेच एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि उद्योगासाठी मागणीनुसार पाणी दिले जाणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे.

गेल्या शुक्रवारी पाटबंधारे विभागाने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. रब्बी हंगामातील पिके, तसेच एकलहरे येथील वीज केंद्रासाठी हे पाणी सोडण्यात आले. सुमारे ७०० ते ८०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात असून, पुढील पंधरा दिवस गंगापूर धरणातून आवर्तन सोडले जाणार आहे. धरणातून पाणी सोडले जात असल्याने, पाण्याच्या प्रवाहात उतरू नये, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

धरणातून सुरू करण्यात आलेला विसर्ग पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नदीकाठावर राहाणाऱ्या मजुरांना गुरुवारी सायंकाळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, काठावर संसार थाटलेल्या राहुट्या काठापासून काही अंतरावर लागल्या आहेत.

--

सोमेश्वर धबधबा खळाळला

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने सोमेश्वर येथील धबधबा पुन्हा वाहू लागला आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचे औचित्य साधून नाशिककर, तसेच नाशिकमध्ये आलेल्या पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली. कोरोनामुळे बंद असलेले मंदिरेही खुली झाल्याने सोमेश्वर परिसराला पुन्हा एकदा झळाली प्राप्त झाली आहे.