शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पावसाचे निराशाजनक आगमन

By admin | Updated: June 21, 2016 00:10 IST

रिमझिम सरी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

सिन्नर : मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा सोमवारी पल्लवित झाल्या. सोमवारी दुपारी सिन्नरसह ग्रामीण भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे पाऊस पडता झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र पावसाने दमदार सलामी न दिल्याने पावसाचे आगमन निराशाजनकच झाले.ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट, जोरदार वादळवारा अशा नेहमीच्या आर्विभावात पावसाचे आगमन न होता केवळ रिमझिम सरी कोसळल्या. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असले तरी पावसाने सिन्नरसह तालुक्याला हुलावणी दिल्याचे चित्र होते. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. मात्र दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. मात्र पावसात जोर नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.तालुक्यातील चास, दोडी, गोंदे, माळवाडी या गावांमध्ये दुपारी रिमझिम पाऊस झाला. पांगरी, वावी, देवपूर, पंचाळे, मिठसागरे, मुसळगाव, गुळवंच या भागातही केवळ रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वाटत होती. मात्र रिमझिम पाऊसवगळता जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.गेल्या पाच वर्षापासून सिन्नर तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. यावर्षी टंचाईचा सामना करताना प्रशासनासह सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यात यावर्षी २० जून उजाडल्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी व प्रशासन हवालदिल झाले आहे. यावर्षी शहरासह ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा जास्त बसल्या.(वार्ताहर)