शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वाहन नोंदणी कॅँप स्थलांतरामुळे गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:23 IST

सटाणा : गेल्या तीन ते चार दशकांपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे येथील ताहाराबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह आवारात वाहन नोंदणी कॅम्प घेतला जात होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या कॅम्पचे स्थलांतर करून शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक रस्त्यावरील चिनार या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात भरविला जात आहे.यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, हा ...

ठळक मुद्देसटाणा : शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांत संताप

सटाणा : गेल्या तीन ते चार दशकांपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे येथील ताहाराबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह आवारात वाहन नोंदणी कॅम्प घेतला जात होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या कॅम्पचे स्थलांतर करून शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक रस्त्यावरील चिनार या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात भरविला जात आहे.यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, हा वाहन नोंदणी कॅम्प पूर्वीच्याच ठिकाणी घेण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना साकडे घातले. राजेंद्र सोनवणे यांनी विभागाचे मोटार वाहन निरीक्षक जमीर तडवी व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सौ.एम.एम. चौधरी यांना येथील चिनार विश्रामगृहावर साकडे घालून आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. अशा परिस्थितीत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर वाहन नोंदणीसाठी भर उन्हात उभे राहवे लागत आहे. यामुळे वाहनधारकांची हेळसांड होत असल्याचे निवेदनात नमूद करून वाहन नोंदणी कॅम्प पूर्वीच्याच जागी घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात वाहन नोंदणी कॅम्पचे आयोजन केले जात होते. मात्र जागा अपुरी पडत असल्याचे कारण दाखवित या कॅम्पचे स्थलांतर शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील नाशिक रस्त्यावरील चिनार विश्रामगृहजवळ केले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून वाहन नोंदणीसाठी येणाºया नागरिकांना शहराबाहेर जाण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय येथे पिण्याच्या पाण्याचीदेखील सुविधा नसल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.