शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांपासून अपंग बांधव उपेक्षितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:38 IST

ओझर : आजही अनेक शासकीय इमारतीत अपंगांसाठी रॅम्प-लिफ्ट नाही, व्हीलचेअर उपलब्ध नाही. शासकीय कार्यालयांत अपंगांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र अथवा तशी व्यवस्था नसल्याने केंद्र सरकारचे सुगम्य भारत अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देशासकीय योजनांपासून वंचित : तालुकानिहाय दाखले वाटप केंद्रांची मागणी

सुदर्शन सारडा।ओझर : आजही अनेक शासकीय इमारतीत अपंगांसाठी रॅम्प-लिफ्ट नाही, व्हीलचेअर उपलब्ध नाही. शासकीय कार्यालयांत अपंगांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र अथवा तशी व्यवस्था नसल्याने केंद्र सरकारचे सुगम्य भारत अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.शासकीय रु ग्णालयात अपंगांना योग्य आरोग्य सेवासुविधा मिळत नाही. आज सर्वत्र जागतिक अपंग दिन साजरा केला जात असताना त्यांना समाजाकडून जास्तीत जास्त मदत आणि सरकारकडून अधिक सोयीसुविधा मिळाल्या तर आजचा दिवस त्यांच्यासाठी उद्याची नवस्वप्ने घेऊन येणारा असेल. अपंगांना अपंगत्वाच्या दाखल्यापासून तर एखादी सरकारी योजना पदरात पाडून घेणे जिकिरीचे ठरत असताना पावलोपावली होणारी त्यांची हेळसांड कधी थांबेल, असा सवाल अपंग बांधव नेहमीच करत असतात.दर बुधवारी व शुक्रवारी जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित केला जातो. त्रिसदस्यीय समितीने चाचणी केल्यानंतर अपंगत्वाचा दाखला दिला जातो. त्यानंतर सदर व्यक्ती अपंग असल्याचे सिद्ध होते. मात्र कॅम्पला जाणाऱ्या अनेक अपंगांना अनेकदा दिवसभर रेंगाळत बसावे लागते. गर्दीमुळे काम न होताच माघारी फिरावे लागते. सदर जिल्हास्तरावरील खेट्या तालुकास्तरावर येणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईचा विचार करता सध्याची उत्पन्न दाखल्याची वार्षिक वीस हजार रुपयांची अट एक लाख रुपये करण्यात यावी. अपंगांना सार्वजनिक सुविधेबरोबरच शौचालय अनुदान मिळाले पाहिजे. अल्पव्याजदर आकारून कर्जवाटप केल्यास उद्योग-व्यवसाय करण्यात अपंगांना मदत होईल. याबरोबरच कागदोपत्रांची जुळवाजुळव करताना व त्यापासून होणाºया त्रासामुळे आजही अनेकजण शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. अपंगत्वाचा दाखला देण्याची परवानगी जिल्ह्यात नाशिक जिल्हा रु ग्णालय आणि मालेगाव येथील उपजिल्हा रु ग्णालय अशा दोनच ठिकाणी आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने नाशिक शहरातील झाकीर हुसेन व बिटको रु ग्णालयाला ही परवानगी दिली आहे. परंतु ग्रामीण भागातील जनतेला शहरात येण्यास होणारी अडचण लक्षात घेता तालुकानिहाय दाखले वाटप केले तर अधिक उपयुक्त ठरेल असे काही अपंग बांधवांचे म्हणणे आहे.अपंग बांधवांना आजही शासकीय कार्यालयात अधिकारी-कर्मचाºयांकडून सौजन्याची वागणूक मिळत नाही. काम घेऊन आलेल्या अपंगांकडे दुर्लक्ष केले जाते. साहजिकच अपंगांची हेळसांड होते आणि मानसिक त्रास होतो. सरकारी अधिकारी-कर्मचाºयांनी अपंगांना सौजन्याने वागणूक देऊन त्यांची शासकीय कामे त्वरित करण्याची गरज आहे.- दत्तू बोडके, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष