शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सुविधांपासून अपंग बांधव उपेक्षितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:38 IST

ओझर : आजही अनेक शासकीय इमारतीत अपंगांसाठी रॅम्प-लिफ्ट नाही, व्हीलचेअर उपलब्ध नाही. शासकीय कार्यालयांत अपंगांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र अथवा तशी व्यवस्था नसल्याने केंद्र सरकारचे सुगम्य भारत अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देशासकीय योजनांपासून वंचित : तालुकानिहाय दाखले वाटप केंद्रांची मागणी

सुदर्शन सारडा।ओझर : आजही अनेक शासकीय इमारतीत अपंगांसाठी रॅम्प-लिफ्ट नाही, व्हीलचेअर उपलब्ध नाही. शासकीय कार्यालयांत अपंगांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी मदत केंद्र अथवा तशी व्यवस्था नसल्याने केंद्र सरकारचे सुगम्य भारत अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.शासकीय रु ग्णालयात अपंगांना योग्य आरोग्य सेवासुविधा मिळत नाही. आज सर्वत्र जागतिक अपंग दिन साजरा केला जात असताना त्यांना समाजाकडून जास्तीत जास्त मदत आणि सरकारकडून अधिक सोयीसुविधा मिळाल्या तर आजचा दिवस त्यांच्यासाठी उद्याची नवस्वप्ने घेऊन येणारा असेल. अपंगांना अपंगत्वाच्या दाखल्यापासून तर एखादी सरकारी योजना पदरात पाडून घेणे जिकिरीचे ठरत असताना पावलोपावली होणारी त्यांची हेळसांड कधी थांबेल, असा सवाल अपंग बांधव नेहमीच करत असतात.दर बुधवारी व शुक्रवारी जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित केला जातो. त्रिसदस्यीय समितीने चाचणी केल्यानंतर अपंगत्वाचा दाखला दिला जातो. त्यानंतर सदर व्यक्ती अपंग असल्याचे सिद्ध होते. मात्र कॅम्पला जाणाऱ्या अनेक अपंगांना अनेकदा दिवसभर रेंगाळत बसावे लागते. गर्दीमुळे काम न होताच माघारी फिरावे लागते. सदर जिल्हास्तरावरील खेट्या तालुकास्तरावर येणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईचा विचार करता सध्याची उत्पन्न दाखल्याची वार्षिक वीस हजार रुपयांची अट एक लाख रुपये करण्यात यावी. अपंगांना सार्वजनिक सुविधेबरोबरच शौचालय अनुदान मिळाले पाहिजे. अल्पव्याजदर आकारून कर्जवाटप केल्यास उद्योग-व्यवसाय करण्यात अपंगांना मदत होईल. याबरोबरच कागदोपत्रांची जुळवाजुळव करताना व त्यापासून होणाºया त्रासामुळे आजही अनेकजण शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. अपंगत्वाचा दाखला देण्याची परवानगी जिल्ह्यात नाशिक जिल्हा रु ग्णालय आणि मालेगाव येथील उपजिल्हा रु ग्णालय अशा दोनच ठिकाणी आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने नाशिक शहरातील झाकीर हुसेन व बिटको रु ग्णालयाला ही परवानगी दिली आहे. परंतु ग्रामीण भागातील जनतेला शहरात येण्यास होणारी अडचण लक्षात घेता तालुकानिहाय दाखले वाटप केले तर अधिक उपयुक्त ठरेल असे काही अपंग बांधवांचे म्हणणे आहे.अपंग बांधवांना आजही शासकीय कार्यालयात अधिकारी-कर्मचाºयांकडून सौजन्याची वागणूक मिळत नाही. काम घेऊन आलेल्या अपंगांकडे दुर्लक्ष केले जाते. साहजिकच अपंगांची हेळसांड होते आणि मानसिक त्रास होतो. सरकारी अधिकारी-कर्मचाºयांनी अपंगांना सौजन्याने वागणूक देऊन त्यांची शासकीय कामे त्वरित करण्याची गरज आहे.- दत्तू बोडके, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष