शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मालेगावी मोसम नदीपात्रात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:33 IST

मालेगाव शहरातील बाजार परिसरातील मांस, मत्स व इतर व्यावसायिकांकडून कचराकुंडी म्हणून घाणकचरा टाकण्यासाठी मोसम नदीपात्राचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

ठळक मुद्देदुर्गंधी : महानगरपालिकेचे दुर्लक्ष; शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मालेगाव मध्य : शहरातील बाजार परिसरातील मांस, मत्स व इतर व्यावसायिकांकडून कचराकुंडी म्हणून घाणकचरा टाकण्यासाठी मोसम नदीपात्राचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.वेळोवेळी तक्रार करूनही मनपाकडून स्वच्छता होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाने नदीपात्राची स्वच्छता करीत टाकाऊ पदार्थ टाकणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहरातून गेलेल्या मोसम नदी एकेकाळी मोक्षगंगा म्हणून ओळखली जात होती. तथापि मागील अनेक वर्षांपासून पर्जन्यवृष्टीचा अनियमिततेमुळे नदी आगामी पावसाळ्याचा अपवादवगळता नदीपात्र कोरडे पडलेले असते. शहराच्या प्रवेशद्वारापासून ते म्हाळदे शिवारातील कचरा डेपोपर्यंत शहरातील गटारीचे दूषित पाणी ठिकठिकाणी नदीपात्रात सोडण्यात येते. त्यामुळे गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच सांडवापूल ते रामसेतूदरम्यान असलेल्या बाजारातील मासे, कोंबडीचे काही व्यावसायिकांकडून टाकाऊ पदार्थ टाकण्यासाठी नदीपात्राचा सर्रास वापर केला जात आहे. इतर व्यावसायिकांकडूनही घाणकचरा टाकण्यात येतो. सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून मनपाकडे अनेकवेळी तक्रारी करण्यात येते मात्र मनपा प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे घाणकचरा व टाकाऊ पदार्थ कुजून परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने जातीने लक्ष देत नदीपात्राची स्वच्छता करून नदीपात्रात घाणकचरा व टाकाऊ पदार्थ टाकणाºया व्यवसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांसह रहिवाशांकडून करण्यात येत आहे. आज दुपारी रामसेतूलगतच्या नदीपात्राची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

उद्या तातडीने रामसेतू येथील स्वच्छता करण्यात येई. मच्छीबाजारातील व्यावसायिकांसाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. यापुढे नदीपात्रात टाकाऊ पदार्थ व घाणकचरा टाकू नये म्हणून समज देण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारे नदी प्रदूषण करणाºयांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल.

- अनिल पारखे, स्वच्छता निरीक्षक, मनपा

परिसरातील व्यावसायिकांकडून नदीपात्राचा कचराकुंडी म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वेळोवेळी मनपाकडे तक्रारी करीत मनपाचे लक्ष वेधण्यात येते. मात्र मनपा प्रशासनाकडून सदर समस्येकडे दुर्लक्ष केले जाते.- रामदास बोरसे, अध्यक्ष, नागरी सुविधा सेवा समिती

टॅग्स :environmentपर्यावरण