शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

घाट झाले गलिच्छ; पाणीही हिरवेगार

By admin | Updated: October 28, 2015 21:36 IST

प्रदूषणाचे ग्रहण : पालथ्या घड्यावर पाणी

नाशिक : गोदावरीचे प्रदूषण रोखण्याबाबत कितीही उपाययोजनांबाबत चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात मात्र नदीपात्र प्रदूषित होऊ नये यासाठीच्या उपाययोजना होताना दिसत नाही. पाणी नसल्याने नदीपात्रातून दुर्गंधी येते, असे मान्य केले तरी पात्रात सोडलेले सांडपाणी, टाकण्यात येणारे निर्माल्य यावर अद्यापही आळा बसलेला नाही. यशवंत महाराज पटांगणापासून ते थेट दसक घाटापर्यंतच्या नव्याने बांधण्यात आलेल्या घाटांची दुरवस्था पाहता प्रशासनाला पात्राचे सौंदर्य अबाधित ठेवण्याला अपयश आले आहे, असेच म्हणावे लागेल. नदीपात्रात निर्माल्य टाकण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने नाशिककर गोदापात्र अस्वच्छ करीत आहे. पुलावर अनेक ठिकाणी नदीपात्रात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात आलेले आहे. काही ठिकाणी तर निर्माल्य कलशदेखील ठेवण्यात आले आहेत. परंतु नागरिक कलशातही निर्माल्य टाकत नसून नदीच्या कडेला किंवा नदीपात्रात निर्माल्य टाकत असल्याचे रोजचेच चित्र आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रात अनेक ठिकाणी ड्रेनेज सोडण्यात आल्यामुळे दुर्गंधीत अधिकच भर पडत आहे. वास्तविक या प्रकाराला आळा घालणे अपेक्षित असताना पालिकेच्या कृपेनेच ड्रेनेज पात्रात सोडण्यात आल्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. नदीपात्र आणि नव्याने तयार करण्यात आलेला गोदाघाट सुस्थितीत ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर संबंधित गावकरी, मित्रमंडळ तसेच सामाजिक संस्थेकडे जबाबदारी सोपविणे शक्य झाल्यास अशा प्रकारावर आळा बसविणे शक्य होईल का याचा विचार पालिकेने करावा, असा एक सूर निसर्गप्रेमी नागरिकांमध्ये उमटत आहे.