शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

घाट झाले गलिच्छ; पाणीही हिरवेगार

By admin | Updated: October 28, 2015 21:36 IST

प्रदूषणाचे ग्रहण : पालथ्या घड्यावर पाणी

नाशिक : गोदावरीचे प्रदूषण रोखण्याबाबत कितीही उपाययोजनांबाबत चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात मात्र नदीपात्र प्रदूषित होऊ नये यासाठीच्या उपाययोजना होताना दिसत नाही. पाणी नसल्याने नदीपात्रातून दुर्गंधी येते, असे मान्य केले तरी पात्रात सोडलेले सांडपाणी, टाकण्यात येणारे निर्माल्य यावर अद्यापही आळा बसलेला नाही. यशवंत महाराज पटांगणापासून ते थेट दसक घाटापर्यंतच्या नव्याने बांधण्यात आलेल्या घाटांची दुरवस्था पाहता प्रशासनाला पात्राचे सौंदर्य अबाधित ठेवण्याला अपयश आले आहे, असेच म्हणावे लागेल. नदीपात्रात निर्माल्य टाकण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने नाशिककर गोदापात्र अस्वच्छ करीत आहे. पुलावर अनेक ठिकाणी नदीपात्रात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात आलेले आहे. काही ठिकाणी तर निर्माल्य कलशदेखील ठेवण्यात आले आहेत. परंतु नागरिक कलशातही निर्माल्य टाकत नसून नदीच्या कडेला किंवा नदीपात्रात निर्माल्य टाकत असल्याचे रोजचेच चित्र आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रात अनेक ठिकाणी ड्रेनेज सोडण्यात आल्यामुळे दुर्गंधीत अधिकच भर पडत आहे. वास्तविक या प्रकाराला आळा घालणे अपेक्षित असताना पालिकेच्या कृपेनेच ड्रेनेज पात्रात सोडण्यात आल्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. नदीपात्र आणि नव्याने तयार करण्यात आलेला गोदाघाट सुस्थितीत ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर संबंधित गावकरी, मित्रमंडळ तसेच सामाजिक संस्थेकडे जबाबदारी सोपविणे शक्य झाल्यास अशा प्रकारावर आळा बसविणे शक्य होईल का याचा विचार पालिकेने करावा, असा एक सूर निसर्गप्रेमी नागरिकांमध्ये उमटत आहे.