शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कंत्राटी कर्मचारी संघटनेची राज्यपालांकडे धाव आरोग्य विद्यापीठ : संघटनेचे अध्यक्ष डी. एल. कराड यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:30 IST

महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगार संघटनेचे तेराव्या दिवशी आंदोलन सुरूच असून, याप्रकरणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे निवेदन सादर करून कंत्राटी कर्मचाºयांना न्याया द्यावा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देसमान वेतन दिले जात नाहीमहत्त्वाच्या विभागांमध्ये जबाबदारीची कामे

नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगार संघटनेचे तेराव्या दिवशी आंदोलन सुरूच असून, याप्रकरणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे निवेदन सादर करून कंत्राटी कर्मचाºयांना न्याया द्यावा, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी राज्यपाल कार्यालयाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे कराड यांनी निवेदनात म्हटले आहे.निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सुमारे ३५० ते ४०० कंत्राटी कामगारांना तुटपुंजे म्हणजेच ६ ते ७ हजार रुपये इतकाच मोबदला दिला जातो. विद्यापीठातील नियमित कर्मचाºयाप्रमाणे कंत्राटी कर्मचारी काम करीत असतानाही त्यांना समान वेतन दिले जात नाही. या कर्मचाºयांना केवळ २६ दिवसदेखील काम दिले जात नाही. असे असतानाही गेली अनेक वर्षे हे कर्मचारी नियमित कर्मचाºयांप्रमाणे महत्त्वाच्या विभागांमध्ये जबाबदारीची कामे सांभाळत आहेत. मात्र नियमित कर्मचाºयांना १८००० ते २४००० इतके वेतन दिले जाते. सर्वाेच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिलेला आहे. त्यानुसार कंत्राटी कर्मचाºयांनादेखील १८००० ते २४००० इतके वेतन देणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु विद्यापीठ प्रशासन मात्र समान कामाला समान दाम देत नाही. याउलट कर्मचाºयांसाठी न्याय मागितला म्हणून विद्यापीठाने नऊ कर्मचाºयांना कामावरून कमी केले आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांपासून ते कुलगुरू, कुलसचिव यांच्यापर्यंत न्याय मागितला आहे. मात्र कंत्राटी कर्मचाºयांना अद्याप न्याय मिळू शकलेला नाही. त्यामुळे राज्यपालांना साकडे घालण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे...तर राजभवनावर मोर्चामहाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कामगार संघटनेने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने अनेक प्रयत्न केले, चर्चा केली, निवेदने दिली; मात्र विद्यापीठाकडून दाद दिली जात नाही. शिवाय कामगार आयुक्त, कामगार न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याने राज्यपालांकडे दाद मागण्यात आली आहे. लोकशाही मार्गाने न्याय न मिळाल्यास पुढील आठवड्यात राजभवनावर मोर्चा काढला जाईल, असे डॉ. डी. एल. कराड यांनी निवेदनात म्हटले आहे.