शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

मका शेतातून थेट कुक्कुटपालकाच्या दारात : कृषी विभागाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नांदगांव (संजीव धामणे) : विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत श्री संत शिरोमणी सावता महाराज योजनेद्वारे शेतकरी व अंतिम उपभोक्ता-वापरकर्ता ...

नांदगांव (संजीव धामणे) : विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत श्री संत शिरोमणी सावता महाराज योजनेद्वारे शेतकरी व अंतिम उपभोक्ता-वापरकर्ता यांची सांगड घालण्याचा उपक्रम सुरू आहे. नांदगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत उत्पादन शेतापासून ते अंतिम वापरकर्त्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यात मका व कांदा ही मुख्य पिके घेण्यात येतात. मका ३२,००० हेक्टर व कांदा ३,५०० हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येते. स्टार्च बनविणाऱ्या कारखान्यांना व कुक्कुट पालन व्यावसायिकांना खाद्य म्हणून मका आवश्यक असते. तालुक्यात अनेक लहान-मोठे कुक्कुट पालक आहेत. त्या दृष्टीने अनकवाडे येथील १५,००० कोंबड्या असलेल्या उद्योगासाठी काही शेतकरी एकत्र आले असून, शेतातून थेट उद्योगापर्यंत मका पोहोविण्यात येणार आहे.

बाजार समितीच्या दैनंदिन लिलाव प्रक्रियेत कमाल बोली बोलणाऱ्या व्यापाऱ्याने जाहीर केलेला भाव शेतकऱ्याला मिळतो, परंतु त्यातून इतर खर्च अडत इत्यादी कमी होतात. म्हणजे एका क्विंटलमागे १०० ते १५० रुपये बोलीच्या भावातून वजा होतात. या व्यतिरिक्त वाहतुकीचा खर्च एकट्यालाच करावा लागतो. शेतकरी एकत्र येऊन त्यांनी मालाची एकत्र वाहतूक केली, तर तो खर्चही कमी होईल. सदरची वाढीव रक्कम शेतकऱ्याला मिळेल, असा कृषी विभागाचा दावा आहे. मात्र, वापरकर्त्याने मका स्वीकारण्यासाठी ओलावा १२ ते १४ टक्के असणे गरजेचे आहे.

एरवी काही शेतकरी मूलभूत सुविधा नसल्याने मका वाळविण्याच्या फंदात पडत नाहीत. काढला की तसाच बाजारात आणतात. त्याला भाव कमी मिळतो, परंतु प्रमाणित दर्जा असेल, तर बाजारातल्या चढ्या भावापेक्षा अधिक भाव, शेत ते अंतिम वापरकर्ता या साखळीत मिळण्याची शक्यता कागदावर दिसत आहे, पण त्यातला व्यापार शेतकऱ्याच्या समूहाला जमणे गरजेचे आहे.

---------------------

नांदगावचा कांदा थेट कोकण, विदर्भ येथे नेण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या ठिकाणी जे पिकत नाही, त्या ठिकाणी थेट वापरकर्ता यांच्यापर्यंत उत्पादन पोहोचले, तर त्याचा फायदा उत्पादक शेतकऱ्याला व्हावा, अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी कोकणचा आंबा नांदगावच्या बाजारात आणण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांशी संधान साधले, तर दोन्हीकडच्या शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी धारणा आहे. त्या दृष्टीने तालुक्यात कृषी विभाग व शेतकरी एकत्र आले आहेत.

----------------