शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

मका शेतातून थेट कुक्कुटपालकाच्या दारात : कृषी विभागाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नांदगांव (संजीव धामणे) : विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत श्री संत शिरोमणी सावता महाराज योजनेद्वारे शेतकरी व अंतिम उपभोक्ता-वापरकर्ता ...

नांदगांव (संजीव धामणे) : विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत श्री संत शिरोमणी सावता महाराज योजनेद्वारे शेतकरी व अंतिम उपभोक्ता-वापरकर्ता यांची सांगड घालण्याचा उपक्रम सुरू आहे. नांदगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत उत्पादन शेतापासून ते अंतिम वापरकर्त्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यात मका व कांदा ही मुख्य पिके घेण्यात येतात. मका ३२,००० हेक्टर व कांदा ३,५०० हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येते. स्टार्च बनविणाऱ्या कारखान्यांना व कुक्कुट पालन व्यावसायिकांना खाद्य म्हणून मका आवश्यक असते. तालुक्यात अनेक लहान-मोठे कुक्कुट पालक आहेत. त्या दृष्टीने अनकवाडे येथील १५,००० कोंबड्या असलेल्या उद्योगासाठी काही शेतकरी एकत्र आले असून, शेतातून थेट उद्योगापर्यंत मका पोहोविण्यात येणार आहे.

बाजार समितीच्या दैनंदिन लिलाव प्रक्रियेत कमाल बोली बोलणाऱ्या व्यापाऱ्याने जाहीर केलेला भाव शेतकऱ्याला मिळतो, परंतु त्यातून इतर खर्च अडत इत्यादी कमी होतात. म्हणजे एका क्विंटलमागे १०० ते १५० रुपये बोलीच्या भावातून वजा होतात. या व्यतिरिक्त वाहतुकीचा खर्च एकट्यालाच करावा लागतो. शेतकरी एकत्र येऊन त्यांनी मालाची एकत्र वाहतूक केली, तर तो खर्चही कमी होईल. सदरची वाढीव रक्कम शेतकऱ्याला मिळेल, असा कृषी विभागाचा दावा आहे. मात्र, वापरकर्त्याने मका स्वीकारण्यासाठी ओलावा १२ ते १४ टक्के असणे गरजेचे आहे.

एरवी काही शेतकरी मूलभूत सुविधा नसल्याने मका वाळविण्याच्या फंदात पडत नाहीत. काढला की तसाच बाजारात आणतात. त्याला भाव कमी मिळतो, परंतु प्रमाणित दर्जा असेल, तर बाजारातल्या चढ्या भावापेक्षा अधिक भाव, शेत ते अंतिम वापरकर्ता या साखळीत मिळण्याची शक्यता कागदावर दिसत आहे, पण त्यातला व्यापार शेतकऱ्याच्या समूहाला जमणे गरजेचे आहे.

---------------------

नांदगावचा कांदा थेट कोकण, विदर्भ येथे नेण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या ठिकाणी जे पिकत नाही, त्या ठिकाणी थेट वापरकर्ता यांच्यापर्यंत उत्पादन पोहोचले, तर त्याचा फायदा उत्पादक शेतकऱ्याला व्हावा, अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी कोकणचा आंबा नांदगावच्या बाजारात आणण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांशी संधान साधले, तर दोन्हीकडच्या शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी धारणा आहे. त्या दृष्टीने तालुक्यात कृषी विभाग व शेतकरी एकत्र आले आहेत.

----------------