शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

‘समृद्धी’साठी जमीनमालकांशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:55 IST

जिल्ह्णातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी अजून ४० टक्के जमीन संपादन करणे बाकी असल्याने त्यासाठी जागा न देणाºया जमीनमालकांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली.

नाशिक : जिल्ह्णातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी अजून ४० टक्के जमीन संपादन करणे बाकी असल्याने त्यासाठी जागा न देणाºया जमीनमालकांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली. शासनाने समृद्धी महामार्गाचे काम चालू महिन्यात सुरू करण्याची तयारी चालविली असली तरी, नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतून फक्त ५७ टक्केच जमिनीची खरेदी झाली आहे. ज्या वेगाने प्रारंभी जमिनींची खरेदी करण्यात आली त्याला गेल्या दोन महिन्यांपासून ब्रेक लागला असून, जमीनमालकांना अजूनही शासनाकडून आशा आहे. शिवडे ग्रामस्थांनी, तर जमिनीची मोजणी करण्यास असलेला विरोध अद्याप कायम ठेवला आहे. अशा परिस्थितीत लवकरात लवकर समृद्धीसाठी जमीन खरेदीसाठी जिल्हाधिकारी थेट जमीनमालक शेतकºयांशी बोलणी करून त्यांना राजी करणार आहे. मात्र असे करताना शिवड्याच्या जमीन मालकांशी कोणतीही चर्चा केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवडे ग्रामस्थांशी थेट सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनीच संवाद साधल्यामुळे आता त्यांच्याकडून जमीन मोजणीची अनुमतीची प्रतीक्षा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी सिन्नर व चांदवड तालुक्यातील अधिकाधिक गावांचा समावेश करण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेसाठी धरणातून गाळ काढण्या साठी लागणाºया यंत्रसामुग्रीसाठी शासनाने इंधनाचे पैसे देण्याची तरतूद केल्यामुळे येत्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर जिल्ह्णात गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असून, सदरचा गाळ शेतकºयांना मोफत दिला जाणार आहे. त्यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होईल व धरणाच्या पाणी साठवणुकीत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.मोबदला देण्यासाठी अवॉर्ड जाहीर करणारसिन्नर-शिर्डी या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असून, चौपदरीकरणासाठी लागणारे भूसंपादनाची तयारी सुरू झाली आहे. लवकरच जागामालकांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी अवॉर्ड जाहीर करण्यात येणार असून, त्यातून शेतकºयांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात प्लॅस्टिक पिशव्या बंदीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असून, नागरिकांना कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.