शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

महामार्गावरील अपघातांमध्ये घट!

By admin | Updated: May 30, 2017 00:38 IST

नाशिक : वाहनांचा वाढलेला वेग, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणात झालेले रूपांतर यामुळे गत काही वर्षांमध्ये परीक्षेत्रातील महामार्गावरील अपघाताचा आलेख चढता होता़

 विजय मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वाहनांचा वाढलेला वेग, वाढती संख्या व त्यातच पूर्वी दुहेरी असलेले राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणात झालेले रूपांतर यामुळे गत काही वर्षांमध्ये नाशिक परीक्षेत्रातील महामार्गावरील अपघाताचा आलेख चढता होता़ मात्र २०१५ व २०१६ या वर्षातील अपघात व त्यातील मयत व जखमी यांच्या आकडेवारीचा तौलनिक अभ्यास केला असता या अपघातांमध्ये अल्पशी घट झाल्याचे समोर आले आहे़ अर्थात ही समाधानाची बाब असली तरी यामध्ये आणखी सुधारणा कशी घडवून आणता येईल, याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे़ नाशिक परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील घोटी, पिंपळगाव, मालेगाव, धुळे, शिरपूर, पाळधी, चाळीसगाव, विसरवाडी व सिन्नर येथून राष्ट्रीय व राज्य महामार्ग आहे़ या चार जिल्ह्यांमधील महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये दरवर्षी सरासरी १५० नागरिक मृत्युमुखी पडतात, तर यावर्षीचा जानेवारी ते मार्च २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत १५३ अपघात झाले असून, त्यामध्ये ६० लोकांचा मृत्यू झाला आहे़ 

राज्यात दरवर्षी होणाऱ्या महामार्गावरील अपघातांमध्ये १२ हजार नागरिकांचा मृत्यू होतो़अतिवेगवान वाहने, लेन कटिंग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, रॅश ड्रायव्हिंग, महामार्गालगतच्या गावांजवळील पंचर वा रोड क्रॉसिंग, रस्त्यात उभी असलेली नादुरुस्त वाहने, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे याबरोबरच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे या कारणांमुळे महामार्गांवरील अपघातांची संख्या वाढते़, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले असून, याचा परिणाम लवकरच बघावयास मिळणार आहे़नाशिक विभागातील नाशिकसह, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांतील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१६ या वर्षात ३२५ अपघात झाले आहेत. यामध्ये १२४ जणांचा मृत्यू झाला असून, ५८६ जण गंभीर जखमी झाले आहेत. २०१५ मध्ये ३६३ अपघात झाले आहेत. यामध्ये १३० जणांचा मृत्यू झाला असून, ५९९ गंभीर जखमी झाले होते़ २०१५च्या तुलनेत २०१६ मधील अपघातांमध्ये घट दिसत असली तरी चालू वर्षी अवघ्या तीन महिन्यांत नाशिक विभागात १५३ अपघात झाले असून, यामध्ये ६० जणांचा मृत्यू, तर १९९ जण जखमी झाले आहेत.