शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

महामार्गावरील अपघातांमध्ये घट!

By admin | Updated: May 30, 2017 00:38 IST

नाशिक : वाहनांचा वाढलेला वेग, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणात झालेले रूपांतर यामुळे गत काही वर्षांमध्ये परीक्षेत्रातील महामार्गावरील अपघाताचा आलेख चढता होता़

 विजय मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वाहनांचा वाढलेला वेग, वाढती संख्या व त्यातच पूर्वी दुहेरी असलेले राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणात झालेले रूपांतर यामुळे गत काही वर्षांमध्ये नाशिक परीक्षेत्रातील महामार्गावरील अपघाताचा आलेख चढता होता़ मात्र २०१५ व २०१६ या वर्षातील अपघात व त्यातील मयत व जखमी यांच्या आकडेवारीचा तौलनिक अभ्यास केला असता या अपघातांमध्ये अल्पशी घट झाल्याचे समोर आले आहे़ अर्थात ही समाधानाची बाब असली तरी यामध्ये आणखी सुधारणा कशी घडवून आणता येईल, याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे़ नाशिक परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील घोटी, पिंपळगाव, मालेगाव, धुळे, शिरपूर, पाळधी, चाळीसगाव, विसरवाडी व सिन्नर येथून राष्ट्रीय व राज्य महामार्ग आहे़ या चार जिल्ह्यांमधील महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये दरवर्षी सरासरी १५० नागरिक मृत्युमुखी पडतात, तर यावर्षीचा जानेवारी ते मार्च २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत १५३ अपघात झाले असून, त्यामध्ये ६० लोकांचा मृत्यू झाला आहे़ 

राज्यात दरवर्षी होणाऱ्या महामार्गावरील अपघातांमध्ये १२ हजार नागरिकांचा मृत्यू होतो़अतिवेगवान वाहने, लेन कटिंग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, रॅश ड्रायव्हिंग, महामार्गालगतच्या गावांजवळील पंचर वा रोड क्रॉसिंग, रस्त्यात उभी असलेली नादुरुस्त वाहने, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे याबरोबरच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे या कारणांमुळे महामार्गांवरील अपघातांची संख्या वाढते़, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले असून, याचा परिणाम लवकरच बघावयास मिळणार आहे़नाशिक विभागातील नाशिकसह, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांतील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१६ या वर्षात ३२५ अपघात झाले आहेत. यामध्ये १२४ जणांचा मृत्यू झाला असून, ५८६ जण गंभीर जखमी झाले आहेत. २०१५ मध्ये ३६३ अपघात झाले आहेत. यामध्ये १३० जणांचा मृत्यू झाला असून, ५९९ गंभीर जखमी झाले होते़ २०१५च्या तुलनेत २०१६ मधील अपघातांमध्ये घट दिसत असली तरी चालू वर्षी अवघ्या तीन महिन्यांत नाशिक विभागात १५३ अपघात झाले असून, यामध्ये ६० जणांचा मृत्यू, तर १९९ जण जखमी झाले आहेत.