शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

पावसाअभावी डाळींबबागा करपल्या

By admin | Updated: July 23, 2014 00:24 IST

स्वप्न कोमेजले : पावसाच्या अनियमिततेने बळीराजा हैराण

रेडगाव खुर्द : पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने डाळींबबागांची लागवड केली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेततळे केले. सूक्ष्म सिंचनाचा वापर केला. परंतु वर्षागणिक पावसाचा लहरीपणा वाढत जाऊन टंचाईची झळ तीव्र होत गेली. अखेर पाण्याअभावी शेकडो शेतकऱ्यांच्या बागा पाण्याअभावी करपल्या आहे. अनेकांनी बागा तोडूनदेखील टाकल्या आहेत.तालुक्यात खरीप व रब्बी या दोन मुख्य हंगामातच शेती होते. त्यातही पावसाची टांगती तलवार कायम आहे. पाटपाण्याचे गाजर हे ४० वर्षांपासून दाखवले जात आहे. निवडणुका आल्या की तेच गाजर दाखवले जाते. त्यामुळे लाल कांदा हे येथील शेतकऱ्यांचे अर्थार्जनाचे नगदी पीक बनले आहे. त्याने कितीही रडवले तरी त्याला सध्यातरी हुकमी पाण्याअभावी पर्याय नाही. अशाही परिस्थितीत कसमा पट्ट्यातील यशस्वी डाळींब शेती पाहून कमी पाण्यावर तग धरणारे तसेच तीन हंगामात फळ घेता येते. गेल्या चार-पाच महिन्यापासून पाणी नाही तसेच पाऊसही लांबल्याने शेतकऱ्यांंच्या डाळींबबागा पाण्याअभावी करपल्या आहे. परिणामी डाळींब बागेवर सुखी स्वप्नावर टंचाईचे पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचा अपेक्षाभंग झाला आहे. पावसाची अनियमितता, अत्यल्प हजेरी, लांबलेला पाऊस यामुळे शेकडो एकरावरील डाळींबबागा करपल्या आहे, तर अनेकांच्या बागांना तेल्यानेही ग्रासले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बागा तोडून टाकल्या आहे. यात श्रम, शेतीचे दोन-तीन हंगाम, खते, सिंचन यांचा खर्च वाया गेला आहे. पन्हाळे येथील नऊ-दहा शेतकऱ्यांंनी बागा तोडल्या आहे तर अजूनही शेतकऱ्यांनी पाऊस येईल, या वर्षी चांगला होईल या आशेवर डाळींबबागा ठेवल्या आहे. डाळींब पीकला अधिक पाणी लागते या अनुमानाप्रत शेतकरी आले आहे. काही शेतकऱ्यांनी डाळींबबागेच्या तुलनेत द्राक्षबाग परवडेल, असे सांगितले. (वार्ताहर)