शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

दिंडोरी तालुक्यात चाऱ्याअभावी जनावरांची भटकंती सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:43 IST

दिंडोरी : तालुका बागायती असून द्राक्ष,ऊस भाजीपाला मोठ्या प्रमाणात आहे मात्र यंदा अद्याप पाऊस न आल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. परिणामी ऊसाचे पीक पाण्याअभावी वाळू लागले असून सर्व नदी पात्र कोरडे झाल्याने पाणी, चा-यासाठी जनावरांची भटकंती सुरू झाली आहे.

गेल्यावर्षी दिंडोरी तालुक्यात सरासरी पाऊस झाला मात्र भिज पाऊस व परतीचा पाऊस न झाल्याने भूजल पातळी खोल गेली आहे. विहिरींनी तळ गाठला असून बोअरवेलही आटले आहेत. त्यातच सर्व धरणांनीही तळ गाठला असून सर्व नदीपात्र कोरडे पडले आहेत. दरवर्षी साधारण मेच्या उत्तरार्धात वळवाचा पाऊस तर जूनमध्ये मोसमी पाऊस सुरू होतो यंदा मात्र अद्याप पाऊस न आल्याने पाणीटंचाई भासत आहे . द्राक्ष बागांना ठिबकद्वारे पाणी देत बागा जिवंत ठेवण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यासाठी ऊस व इतर पिके वाºयावर सोडावी लागत आहे. अवनखेड परिसरात ऊस पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. तालुक्यात राजस्थानमधील गायी मोठ्या प्रमाणात आहेत मात्र चारा व पाणी उपलब्ध नसल्याने त्यांना भटकंती करावी लागत आहे. काही शेतक-यांनी ठिबकद्वारे टोमॅटो लागवड केली मात्र पाऊस नसल्याने पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळा सुरु होऊन दहा दिवस उलटून गेले तरी पाऊस न आल्याने शेतक-यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई