शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात नागली, वरई पिक झाले दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 17:39 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग एके काळी नागली व वरईचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये या परिसरामध्ये शासनाच्या योजना पोहचल्यांमुळे पावसाळी हंगामात पाण्याची साठवणुक करण्यासाठी छोट मोठ्या पाझार तलावाची न्ाििर्मती झाल्यांमुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या पारपांरिक पिकामध्ये बदल करु न जास्त उत्पादन देणाºया पिकांकडे वळल्यांमुळे नागली व वरई पिक या भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देलखमापूर : परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

लखमापूर : दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग एके काळी नागली व वरईचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये या परिसरामध्ये शासनाच्या योजना पोहचल्यांमुळे पावसाळी हंगामात पाण्याची साठवणुक करण्यासाठी छोट मोठ्या पाझार तलावाची न्ाििर्मती झाल्यांमुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या पारपांरिक पिकामध्ये बदल करु न जास्त उत्पादन देणाºया पिकांकडे वळल्यांमुळे नागली व वरई पिक या भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.साधारणपणे नागली व वरई पिक चार महिन्याचे असते त्यांत या पिकांचे रोपे तयार करावे लागतात. मे महिन्यातच या रोपासाठी काडी कचरा गोळा करून रोपाची जागा भाजून घेतात. व जून महिन्यात पहिला पाऊस पडल्या नंतर रोपे टाकली जातता साधारण २२ते२३ दिवसा मध्ये हे रोपे तयार होतात मग जमिनीची मशागत करून व पावसाचा अदांज पाहून नागली , वरई पिकाची लावणी केली जाते हे पिक जास्ती जास्त डोंगरउतारावर घेतले जाते या पिकाला भरपूर पाऊस लागतो.सध्या नागली व वरईला ग्रामीन भागासह शहरी भागात जास्त मागणी आहे.नागलीचा उपयोग भाकरी तसेच पापड बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच सध्यात मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये नागली पापड , बिस्कीटला जास्त मागणी आहे.वरईचा वापर ग्रामीण व शहरी भागामध्ये उपवासासाठी केला जातो. असे असले तरी मागणीच्या प्रमाणात उत्पादन कमी होत असल्यामुळे व नागली वरई पिकाचे एकरी उत्पादन खूपच कमी मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाने या पिकांकडे पूर्णपणे पाठ फिरविल्यामुळे नागली व वरई हे पिक तालुक्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परवडत नसलेली शेती म्हणून या पिकाकडे पाहिले जाते परिणामी या परिसरातील शेतकºयांनी या पांरपारिक शेतीकडे पाठ फिरवून इतर भाजीपाला पिकाना पंसती दिली आहे.

१) नागली ,वरई, हे पिके पुर्वीच्या काळी दिंडोरी तालुक्यातील सोन्याचे पिक म्हणून ओळखले जायचे. परंतु आता मात्र काळाच्या ओघात या पिकाला उतरती कळा लागल्याने दिंडोरी तालुक्यात नागली व वरई हे दृष्टी आड जाते कि काय असा सवाल निर्माण झाला आहे.२)कृषी विभागाकडून या पिकांसाठी शेतकरी वर्गाला वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या स्वरूपाची मार्गदर्शन देवून ही शेतकरी वर्गाने हे पिक परवडत नसल्याची खंत दाखिवली आहे.नागली व वरई पिकापासून एकरी उत्पादन खूप कमी मिळत असल्यांमुळे उत्पन्नात घट येते . त्यांमुळे आम्ही हे पिक फक्त कुटूंबासाठी लागेल एवढेच घेतो. नागली,वरई जागी आम्ही इतर पिकानां पंसती दिली आहे.- मोहनराव गायकवाड ,शेतकरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी