शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
4
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
5
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
6
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
7
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
8
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
9
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
10
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
11
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
12
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
13
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
14
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
15
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
16
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
17
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
18
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
19
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
20
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल

दिंडोरी तालुक्यात नागली, वरई पिक झाले दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 17:39 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग एके काळी नागली व वरईचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये या परिसरामध्ये शासनाच्या योजना पोहचल्यांमुळे पावसाळी हंगामात पाण्याची साठवणुक करण्यासाठी छोट मोठ्या पाझार तलावाची न्ाििर्मती झाल्यांमुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या पारपांरिक पिकामध्ये बदल करु न जास्त उत्पादन देणाºया पिकांकडे वळल्यांमुळे नागली व वरई पिक या भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देलखमापूर : परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

लखमापूर : दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग एके काळी नागली व वरईचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये या परिसरामध्ये शासनाच्या योजना पोहचल्यांमुळे पावसाळी हंगामात पाण्याची साठवणुक करण्यासाठी छोट मोठ्या पाझार तलावाची न्ाििर्मती झाल्यांमुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या पारपांरिक पिकामध्ये बदल करु न जास्त उत्पादन देणाºया पिकांकडे वळल्यांमुळे नागली व वरई पिक या भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.साधारणपणे नागली व वरई पिक चार महिन्याचे असते त्यांत या पिकांचे रोपे तयार करावे लागतात. मे महिन्यातच या रोपासाठी काडी कचरा गोळा करून रोपाची जागा भाजून घेतात. व जून महिन्यात पहिला पाऊस पडल्या नंतर रोपे टाकली जातता साधारण २२ते२३ दिवसा मध्ये हे रोपे तयार होतात मग जमिनीची मशागत करून व पावसाचा अदांज पाहून नागली , वरई पिकाची लावणी केली जाते हे पिक जास्ती जास्त डोंगरउतारावर घेतले जाते या पिकाला भरपूर पाऊस लागतो.सध्या नागली व वरईला ग्रामीन भागासह शहरी भागात जास्त मागणी आहे.नागलीचा उपयोग भाकरी तसेच पापड बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच सध्यात मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये नागली पापड , बिस्कीटला जास्त मागणी आहे.वरईचा वापर ग्रामीण व शहरी भागामध्ये उपवासासाठी केला जातो. असे असले तरी मागणीच्या प्रमाणात उत्पादन कमी होत असल्यामुळे व नागली वरई पिकाचे एकरी उत्पादन खूपच कमी मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाने या पिकांकडे पूर्णपणे पाठ फिरविल्यामुळे नागली व वरई हे पिक तालुक्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परवडत नसलेली शेती म्हणून या पिकाकडे पाहिले जाते परिणामी या परिसरातील शेतकºयांनी या पांरपारिक शेतीकडे पाठ फिरवून इतर भाजीपाला पिकाना पंसती दिली आहे.

१) नागली ,वरई, हे पिके पुर्वीच्या काळी दिंडोरी तालुक्यातील सोन्याचे पिक म्हणून ओळखले जायचे. परंतु आता मात्र काळाच्या ओघात या पिकाला उतरती कळा लागल्याने दिंडोरी तालुक्यात नागली व वरई हे दृष्टी आड जाते कि काय असा सवाल निर्माण झाला आहे.२)कृषी विभागाकडून या पिकांसाठी शेतकरी वर्गाला वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या स्वरूपाची मार्गदर्शन देवून ही शेतकरी वर्गाने हे पिक परवडत नसल्याची खंत दाखिवली आहे.नागली व वरई पिकापासून एकरी उत्पादन खूप कमी मिळत असल्यांमुळे उत्पन्नात घट येते . त्यांमुळे आम्ही हे पिक फक्त कुटूंबासाठी लागेल एवढेच घेतो. नागली,वरई जागी आम्ही इतर पिकानां पंसती दिली आहे.- मोहनराव गायकवाड ,शेतकरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी