शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत ९१ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: December 28, 2015 22:58 IST

नगरपंचायत निवडणूक : शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांची माघार

दिंडोरी : नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत २३ उमेदवारांनी माघार घेतली असून, १७ जागांसाठी तब्बल ९१ उमेदवार रिंगणात आहेत.विद्यमान सरपंच छबाबाई वाघ, माजी सरपंच व विद्यमान सदस्य विजयबापू देशमुख, आनंदा कराटे, विद्यमान सदस्य किशोर रेहरे, परशराम कराटे, जयवंता धामोडे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे, तर युवक कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील आव्हाड आदिंनी माघार घेतली. नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी १७ प्रभागांतून ११५ उमेदवारांनी १५४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. निवडणूक निरीक्षक रघुनाथ गावडे, निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश भोगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत माघारी प्रक्रिया पार पडली. एकूण ११४ उमेदवारांपैकी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत २३ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र तब्बल ४० अपक्ष उमेदवारांनी माघार न घेता स्वबळ अजमावण्याचा निर्णय घेतल्याने अनेक प्रभागात बहुरंगी लढती रंगणार आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी काही अपक्ष उमेदवारांना पक्षीय उमेदवारांनी माघारीसाठी गळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्या उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती त्या पक्षाच्या नेत्यांनीही माघारीसाठी प्रयत्न केले; परंतु अनेक उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आपली उमेदवारी कायम ठेवली. शिवसेना १६, भाजपा १४, कॉँग्रेस १०, राष्ट्रवादी ६, मनसे ३, तर माकप २ जागा लढवत असून, ४० अपक्ष रिंगणात आहेत.प्रभाग-१ मधून गोरख पवार यांनी माघार घेतली असून, येथे आता चार पक्षीय उमेदवारांबरोबर पाच अपक्ष असे एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग-२ मधून रचना विक्रमसिंह राजे यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग-३ मध्ये सुनील आव्हाड, सचिन आव्हाड, कैलास देशमुख यांनी माघार घेतली असून, आता पक्षीय तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग-४ मधून सोनाली मनोजकुमार पगारे यांनी माघार घेतली असून, पक्षीय तिरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग-५ मधून तीन पक्षीय उमेदवारांबरोबर तीन अपक्ष अशी षटकोनी लढत रंगणार आहे. प्रभाग-६ मधून रोहिणी परशराम कराटे यांनी माघार घेतली असून, चार पक्षीय उमेदवारांसह दोन अपक्ष अशी षटकोनी लढत होणार आहे. प्रभाग-७ मध्ये प्रीतम देशमुख यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. प्रभाग-८मध्ये घनश्याम चव्हाण, प्रमोद देशमुख यांनी माघार घेतली असून, दोन पक्षीय उमेदवार व चार अपक्ष अशी षटकोनी लढत रंगणार आहे. प्रभाग-९ मधून कार्तिकी अरुण गायकवाड यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व चार अपक्ष अशी सप्तरंगी लढत रंगणार आहे.प्रभाग-१० मध्ये छाया धोंडीराम जाधव यांनी माघार घेतली असून, दोन पक्षीय व एक अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग-११ मध्ये जयेश श्याम गवारे यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व पाच अपक्ष अशी अष्टकोनी लढत होणार आहे. प्रभाग-१२ मध्ये पुष्पा रमेश जाधव, अर्चना प्रवीण सोनवणे यांनी माघार घेतली असून, येथे दोन पक्षीय व एक अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग-१३ मध्ये संतोष पगार, दत्तात्रेय शिंदे, दीपक जाधव यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व तीन अपक्ष यांच्यात षटकोनी लढत रंगणार आहे. प्रभाग १४ मधून कुणीही माघार घेतली नसून दोन पक्षीय व दोन अपक्ष यांच्यात चौरंगी लढत होत आहे. प्रभाग-१५ मधील आनंदा कराटे यांनी माघार घेतली असून, पक्षीय पाच व तीन अपक्ष अशी अष्टकोनी लढत होत आहे. प्रभाग १६ मधून कुणीही माघार घेतली नसून तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत होत आहे, तर प्रभाग-१७ मधून राधिका श्यामराव फसाळे यांनी माघार घेतली असून, तीन पक्षीय व एक अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. दरम्यान, आज मंगळवार रोजी निशाणी वाटपानंतर प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होणार असून, अधिकृत माघारीची वेळ जरी संपली असली तरी काही अपक्षांची मनधरणी करत जाहीर पाठिंबा घेण्यासाठी काही उमेदवारांची धडपड सुरू आहे. (वार्ताहर)