शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजीटल इंडिया’ला प्रारंभ

By admin | Updated: July 5, 2015 01:16 IST

‘डिजीटल इंडिया’ला प्रारंभ

  नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केलेल्या डिजीटल इंडिया मोहिमेचा प्रारंभ नाशिक जिल्'ातही करण्यात आला. शहरातील महा-ई-सेवा केंद्र चालकांची या संदर्भात बैठक घेऊन त्यांना जिल्हा प्रशासनाकडून उपकरणांचे वाटप करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत सर्वप्रथम सेवानिवृत्त पेन्शनधारक वृद्धांना मोठा दिलासा मिळणार असून, जीवन प्रमाण या प्रणालीच्या माध्यमातून त्यांच्या हयातीच्या दाखल्याची कटकट मिटणार आहे. सेवानिवृत्त पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचा दाखला संबंधित बॅँक व पेन्शन खात्याला सादर करावा लागतो. अगोदरच वयोवृद्ध असल्याने जीवंत असूनही हयात असल्याचे दाखविण्यासाठी पेन्शनधारकांना बॅँक, पेन्शन खात्याचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यावर आता ‘डिजीटल इंडिया’च्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला असून, जीवन प्रमाण या प्रणालीद्वारे पेन्शनधारकांना आपल्या नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन फक्त आपले आधारकार्ड व बॅँकेचे खाते क्रमांक द्यावे लागणार आहे. केंद्रात पेन्शनधारकाच्या अंगठ्याचा ठसा घेऊन नोंदणी झाल्यास संबंधित बॅँकेत पेन्शनधारकाची संपूर्ण माहिती पोहोचेल, ज्या अर्थी पेन्शनधारक अंगठ्याचा ठसा नोंदवितो, त्या अर्थी पेन्शनधारक हयात असल्याचे स्पष्ट होत असल्याने पेन्शनसाठी पुन्हा नव्याने हयातीचा दाखला देण्याची गरज त्यामुळे भासणार नाही. ‘जीवन प्रमाण’ असे या प्रणालीला नाव देण्यात आले असून, त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालक फक्त वीस रुपये शुल्क आकारणार आहे. ‘नॅशनल डिजीटल लिट्रसी मिशन’ या प्रणालीलाही जिल्'ात सुरुवात करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस संगणकीय तंत्रज्ञानाने साक्षर करण्यात येणार आहे. महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून १४ ते ६० वयोगटातील कोणतीही व्यक्ती हे ज्ञान आत्मसात करेल. साधारणत: चाळीस तासाचे हे प्रशिक्षण कसे द्यायचे याचा सर्वस्वी निर्णय महा-ई-सेवा केंद्र चालकावर सोपविण्यात आला आहे. नागरिकांना तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या मोबदल्यात केंद्र चालकाला शासनाकडून सर्वसाधारण गटाच्या व्यक्तीच्या मोबदल्यात ३७५ रुपये, तर मागासवर्गीय, आदिवासी व्यक्तीच्या मोबदल्यात ५०० रुपये दिले जाणार आहे. शासनाचे अनुदान उकळण्यासाठी बनावट लाभार्थी केंद्र चालकाकडून दाखविले जाण्याची शक्यता गृहीत धरून शासनाकडून ज्या व्यक्तीला संगणक तंत्रज्ञानाने साक्षर केले जाईल त्यांची परीक्षा (चाचणी) घेतली जाईल व त्यानंतरच केंद्रचालकाला अनुदान दिले जाणार आहे.