शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

आदिवासींना अंडी पोहोचविण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:53 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संचारबंदी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी आॅनलाइन संपर्क साधून नियमित कामकाजाचा आढावा घेतला.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संचारबंदी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी आॅनलाइन संपर्क साधून नियमित कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लॉकडाउनमुळे ग्रामीण भागात अंडीचा व केळीचा पुरवठा करण्यात येत असलेल्या अडचणीसमोर आल्या असून, दूरवरच्या वाहतुकीमुळे अंडी फुटण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कोणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलेला असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या मासिक सभा होत नाही, मात्र कामकाजाचा आढावा घेणे गरजेचे असल्याने महिला व बालकल्याण सभापतींनी जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बालविकास प्रकल्पातील कामकाजाचा आढावा घेतला. त्यात अंगणवाडीतील बालकांना ५० दिवस पुरेल इतका पोषण आहाराचे वाटप झालेले असून, ३० मेपर्यंत पुरेल इतका आहार पुरवठा करण्यात आला आहे. तसेच गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींनादेखील आहाराचे वाटप झाले आहे. मालेगाव प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी अति दक्षता घेऊन आहाराचे वाटप करावे, अशा सूचना सभापतींनी दिल्या. कुपोषित बालकांची संख्येत वाढ होऊ नये यासाठी त्यांना ताजा आहार देण्याची कार्यवाही सुरू असून, सभापती अश्विनी आहेर यांनी राज्याचे महिला व बालविकास आयुक्तयांच्याशी चर्चा करून सर्व बालकांना १५ मेपासून गरम ताजा आहार देण्यास मान्यता दिली आहे, असे महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे यांनी सांगितले.आदिवासी भागात ‘अमृत आहार’ वाटपासाठी केळी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अंडी वाटपाचे काम केले जात असले तरी, स्थानिक गावात अंडी उपलब्ध करताना आदिवासी भागात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. इतर गावांतील बाजाराच्या ठिकाणाहून अंडी आणून पुरवठा केला जात आहे. मात्र अंड्यांची वाहतूक करताना अंडी फुटण्याचे प्रमाण वाढल्याचे सुरगाणा व त्र्यंबकेश्वरच्या अधिकाºयांनी सांगितले. असे असले तरी, अंडी वाटपात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदfoodअन्न