शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

वीरशेत येथे अतिसाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:03 IST

तालुक्यातील वीरशेत परिसरातील आदिवासी बांधवांना अतिसाराची लागण झाली असून, गावातील बंद असलेल्या हातपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने अतिसार या साथीने आदिवासी दुर्गम भागात थैमान घातले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवसापर्यंत रुग्णांची संख्या ३७ पर्यंत पोहोचली आहे.

कळवण : तालुक्यातील वीरशेत परिसरातील आदिवासी बांधवांना अतिसाराची लागण झाली असून, गावातील बंद असलेल्या हातपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने अतिसार या साथीने आदिवासी दुर्गम भागात थैमान घातले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवसापर्यंत रुग्णांची संख्या ३७ पर्यंत पोहोचली आहे.  कळवण उपजिल्हा रु ग्णालयात मंगळवारी रात्री उपचारासाठी दाखल केलेल्या दिलीप लक्ष्मण गवळी (१८ ) यांची तपासणीसह वैद्यकीय उपचार केल्याने प्रकृतीत सुधारणा झाली आहे. वीरशेतच्या हरिश्चंद्र जाधव (४०) यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला.  अतिसाराच्या रु ग्णांची संख्या वाढत असल्याने आदिवासी बांधव भयभीत झाले आहेत. वीरशेतच्या जिल्हा परिषद शाळेत अतिसाराच्या  रु ग्णावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तर काही रुग्णांनाची वैद्यकीय तपासणी करून प्रकृती ठीक असल्याकारणाने त्यांना घरी पाठविण्यात आले.  दरम्यान वीरशेत येथे बुधवारी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, यशवंत गवळी, कळवण पंचायत समितीचे सभापती लालाजी जाधव, उपसभापती विजय शिरसाठ, माजी सभापती मधुकर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे, साथरोग वैद्यकीय अधिकारी दिनेश पाटील, कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, यांनी भेट देऊन रु ग्णांची विचारपूस  केली.गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक मंगळवारपासून वीरशेत येथे तळ ठोकून आहेत.  गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे सर्व स्रोत बंद करण्यात आले असून, ज्या रु ग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना अधिक उपचारासाठी दळवट, कळवण व नाशिक येथे पाठवण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद