शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

हिरे कुटुंबीयांचे राजकीय वर्तुळ पूर्ण

By श्याम बागुल | Updated: December 8, 2018 00:55 IST

कॉँग्रेसच्या विचारसरणीत घडलेल्या हिरे कुटुंबीयांनी नेहमीच सत्तेच्या परिघातच राहणे पसंत केले, परिणामी पुष्पाताई हिरेंच्या रूपाने राज्याच्या सत्तेवर अनेक वर्षे या कुटुंबाने राज्य केले. कालांतराने राजकारणाचे वारे काहीसे उलटे फिरू लागताच, पुष्पातार्इंचे पुत्र प्रशांत हिरे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत उचलले. पुन्हा राज्यात व केंद्रात कॉँग्रेस आघाडीची सत्ता येताच, राष्टÑवादीशी घरोबा केला. परंतु राष्टÑवादीने जिल्ह्णाचे राजकीय नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करताच, नाराज हिरे कुटुंबीयांनी स्वत:ला काहीकाळ विजनवासात कोंडून घेतले. साडेचार वर्षांपूर्वी सर्वत्र भाजपाचा बोलबाला सुरू झाला असता, प्रशांत हिरे यांचे पुत्र अपूर्व यांनी शिक्षक मतदारसंघातून अपक्ष निवडून येत सत्ताधारी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व पत्करले. आता राज्यातील राजकीय वातावरणात होत असलेल्या बदलाच्या वारूवर स्वार होत, हिरे कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ कॉँग्रेसच्या घराण्याशी नाळ जोडून घेत आपले राजकीय वर्तुळ पूर्ण केले.

नाशिक : कॉँग्रेसच्या विचारसरणीत घडलेल्या हिरे कुटुंबीयांनी नेहमीच सत्तेच्या परिघातच राहणे पसंत केले, परिणामी पुष्पाताई हिरेंच्या रूपाने राज्याच्या सत्तेवर अनेक वर्षे या कुटुंबाने राज्य केले. कालांतराने राजकारणाचे वारे काहीसे उलटे फिरू लागताच, पुष्पातार्इंचे पुत्र प्रशांत हिरे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत उचलले. पुन्हा राज्यात व केंद्रात कॉँग्रेस आघाडीची सत्ता येताच, राष्टÑवादीशी घरोबा केला. परंतु राष्टÑवादीने जिल्ह्णाचे राजकीय नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करताच, नाराज हिरे कुटुंबीयांनी स्वत:ला काहीकाळ विजनवासात कोंडून घेतले. साडेचार वर्षांपूर्वी सर्वत्र भाजपाचा बोलबाला सुरू झाला असता, प्रशांत हिरे यांचे पुत्र अपूर्व यांनी शिक्षक मतदारसंघातून अपक्ष निवडून येत सत्ताधारी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व पत्करले. आता राज्यातील राजकीय वातावरणात होत असलेल्या बदलाच्या वारूवर स्वार होत, हिरे कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ कॉँग्रेसच्या घराण्याशी नाळ जोडून घेत आपले राजकीय वर्तुळ पूर्ण केले.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांनी मुंबईत राष्टÑवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याने त्यातून नाशिक जिल्ह्यातील राजकारणात भविष्यात काही उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, जिल्ह्णाच्या राजकारणावर भुजबळ यांची असलेली मजबूत पकड पाहता, हिरे कुटुंबीयांना भुजबळ यांच्याशी मिळते-जुळते घेऊनच आगामी वाटचाल करावी लागणार आहे. निव्वळ हिरेंच्या प्रचारसभेला भुजबळ उशिरा पोहोचल्याने पराभव पत्करावा लागला या एकमेव कारणातून निर्माण झालेल्या भुजबळ द्वेषातून हिरे कुटुंबीयांनाही गेल्या साडेचार वर्षांत फारसे काहीही साध्य झाले नाही या वास्तवाचे भान जसे त्यांना उमगले तसेच त्याची अप्रत्यक्ष किंमत भुजबळ यांनाही काहीशी भोगावी लागली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवाला नाही म्हटले तरी, हिरेंची नाराजीही काही प्रमाणात कारणीभूत राहिली आहे. परंतु आता भुजबळ यांनाही याची जाणीव झाली व त्यातूनच हिरे यांच्या राष्टÑवादीचा प्रवेश सुकर झाला हेदेखील मान्य करावे लागेल. ज्या भुजबळ यांच्यामुळेराजकीय विजनवासात पत्करावा लागला. त्या भुजबळांशी उघडपणे दोन हात करण्याचे आव्हानदेणाऱ्या हिरे कुटुंबीयांनीच जुळवून घेण्यास पुढाकार घेतला, त्यातूनच तुरुंगात असलेल्या भुजबळयांना कोर्टात भेटण्यास हिरेंनी धाव घेऊन संवादाचा पहिला सेतू निर्माण केला व प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून समीर भुजबळ यांनी हिरेंचा उंबरठा ओलांडल्याने या दोन्ही कुटुंबीयातील जवळीकता वाढीस लागली.आता हिरे स्वगृही परतल्याने त्यामागे नक्कीच राजकीय असेलच हे जसे नाकारता येणार नाही, तसेच हिरे यांनासोबत ठेवल्यानेच भुजबळ यांचीही जिल्ह्यातील राजकीय वाटचाल सुकर होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस