शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कृषी आयुक्तांकडून शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:04 IST

सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आधुुनिक तंत्रज्ञानावर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासह मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देसिन्नरच्या शेतकऱ्यांसोबत बैठक : चंदन शेतीस विमा संरक्षण मिळण्याची मागणी

सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आधुुनिक तंत्रज्ञानावर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासह मार्गदर्शन केले.रिसोर्स बँकेतील शेतकरी, चंदन व सोलापूर लाल डाळिंब शेतीचा प्रयोग राबविणारे तालुक्यातील उजनी येथील राम मोहन सुरसे यांच्याकडून पीकांविषयी माहिती घेतली, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांशी शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत संवाद साधला. चंदन शेतीस विमा संरक्षण, संरक्षणात्मक बाबींसाठी शासकीय अर्थसाहाय्य मिळावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन सुरसे यांनी आयुक्तांना दिले.कृषी आयुक्त कुमार यांनी सिन्नर तालुक्याचा दौरा केला. नायगाव येथील गोदा दारणा अग्रो प्रोड्युसर कंपनीच्या एकात्मिक कृषी विकास (आयएडी) कांदा प्रकल्पास भेट देत कांदा खरेदीबाबत माहिती घेतली. यावेळेस अध्यक्ष एकनाथ सानप, संचालक रवींद्र कापडी, अर्जुन दिघोळे, गणेश पानसरे, संदीप लहाने, मंडळ कृषी अधिकारी महेश वेठेकर, कृषी पर्यवेक्षक रणजित आंधळे, कृषी सहायक सचिन भगत आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे राज्यस्तरीय पीक स्पर्धा विजेते सुहास वसंतराव बर्वे, अप्पासाहेब नामदेव आरोटे यांची भेट देऊन शेतीत वापरलेल्या तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली. याप्रसंगी नानासाहेब संधान, योगेश संधान, सुनील गाडे, मनोज गाडे, लक्ष्मण बर्गे, हरिराम गाडे, निखिल बर्वे, अशोक वाजे, विभागीय कृषी सह संचालक संजीव पडवळ, विभागीय कृषी अधीक्षक अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, सहायक अर्चना चौधरी, वंदना कुऱ्हाडे, प्रदीप भोर, दीपक कुसळकर उपस्थित होते.पीक स्पर्धेत सिन्नरची आघाडीरबी हंगाम २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील ५३ शेतकऱ्यांनी गहू पिकात सर्वसाधारण गटात, तर आदिवासी गटात ५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. हरभरा पिकात १५ सर्वसाधारण शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यात डुबेरे येथील सुहास वसंतराव बर्वे यांनी ९०.७१० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादकतेसह राज्यात प्रथम, तर महाजनपूर येथील अप्पासाहेब नामदेव आरोटे यांना ९० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादकतेसह द्वितीय क्रमांक मिळाला आहे. 

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती