शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

कृषी आयुक्तांकडून शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:04 IST

सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आधुुनिक तंत्रज्ञानावर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासह मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देसिन्नरच्या शेतकऱ्यांसोबत बैठक : चंदन शेतीस विमा संरक्षण मिळण्याची मागणी

सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आधुुनिक तंत्रज्ञानावर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासह मार्गदर्शन केले.रिसोर्स बँकेतील शेतकरी, चंदन व सोलापूर लाल डाळिंब शेतीचा प्रयोग राबविणारे तालुक्यातील उजनी येथील राम मोहन सुरसे यांच्याकडून पीकांविषयी माहिती घेतली, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांशी शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत संवाद साधला. चंदन शेतीस विमा संरक्षण, संरक्षणात्मक बाबींसाठी शासकीय अर्थसाहाय्य मिळावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन सुरसे यांनी आयुक्तांना दिले.कृषी आयुक्त कुमार यांनी सिन्नर तालुक्याचा दौरा केला. नायगाव येथील गोदा दारणा अग्रो प्रोड्युसर कंपनीच्या एकात्मिक कृषी विकास (आयएडी) कांदा प्रकल्पास भेट देत कांदा खरेदीबाबत माहिती घेतली. यावेळेस अध्यक्ष एकनाथ सानप, संचालक रवींद्र कापडी, अर्जुन दिघोळे, गणेश पानसरे, संदीप लहाने, मंडळ कृषी अधिकारी महेश वेठेकर, कृषी पर्यवेक्षक रणजित आंधळे, कृषी सहायक सचिन भगत आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे राज्यस्तरीय पीक स्पर्धा विजेते सुहास वसंतराव बर्वे, अप्पासाहेब नामदेव आरोटे यांची भेट देऊन शेतीत वापरलेल्या तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली. याप्रसंगी नानासाहेब संधान, योगेश संधान, सुनील गाडे, मनोज गाडे, लक्ष्मण बर्गे, हरिराम गाडे, निखिल बर्वे, अशोक वाजे, विभागीय कृषी सह संचालक संजीव पडवळ, विभागीय कृषी अधीक्षक अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, सहायक अर्चना चौधरी, वंदना कुऱ्हाडे, प्रदीप भोर, दीपक कुसळकर उपस्थित होते.पीक स्पर्धेत सिन्नरची आघाडीरबी हंगाम २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील ५३ शेतकऱ्यांनी गहू पिकात सर्वसाधारण गटात, तर आदिवासी गटात ५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. हरभरा पिकात १५ सर्वसाधारण शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यात डुबेरे येथील सुहास वसंतराव बर्वे यांनी ९०.७१० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादकतेसह राज्यात प्रथम, तर महाजनपूर येथील अप्पासाहेब नामदेव आरोटे यांना ९० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादकतेसह द्वितीय क्रमांक मिळाला आहे. 

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती