शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

शेवटचे तीन दिवस  रात्री बारापर्यंत धूम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:23 IST

सर्वोच्च न्यायालयाने सण, उत्सवाच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास मुभा दिलेली असतानाही अशा दिवसांची माहिती गणेशभक्तांपासून दडपून ठेवली जात असून, त्याचाच भाग म्हणून सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत राज्य सरकारने गणेश मंडळांचे देखावे व वाद्य वाजविण्याची अनुमती दिलेली असताना पोलीस व जिल्हा प्रशासनाने त्याचा गाजावाजा न करण्यात धन्यता मानली आहे.

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने सण, उत्सवाच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास मुभा दिलेली असतानाही अशा दिवसांची माहिती गणेशभक्तांपासून दडपून ठेवली जात असून, त्याचाच भाग म्हणून सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत राज्य सरकारने गणेश मंडळांचे देखावे व वाद्य वाजविण्याची अनुमती दिलेली असताना पोलीस व जिल्हा प्रशासनाने त्याचा गाजावाजा न करण्यात धन्यता मानली आहे. असे असले तरी, शुक्रवार ते रविवार असे शेवटचे तीन दिवस गणेशभक्तांना रात्री बारा वाजेपर्यंत धूम करण्याची मोकळीक शासनाने दिल्यामुळे नाशिककरांना गणेशदर्शनाचा मध्यरात्रीपर्यंत लाभ घेता येणार आहे.  सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारचे वाद्य वाजविण्यास निर्बंध घातले असले तरी, देशातील काही राज्यांमध्ये साजरे केले जाणारे सण, उत्सवांचा विचार करता वर्षभरातील पंधरा दिवस अशा प्रकारचे निर्बंध शिथिल करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात सोमवार, दि. १७ सप्टेंबर व २१ ते २३ सप्टेंबर असे चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्याची मुभा देणारी अधिसूचना गृहखात्याने यापूर्वीच जारी करून त्याची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना पोलीस व जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. तथापि, यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची भीती दाखवित पोलीस, महापालिका, जिल्हा प्रशासनाने गणेशभक्तांची या ना त्या कारणाने उत्सवापूर्वीच अडवणूक करण्यावर भर दिला.  रस्त्यावर मंडप उभारणीच्या परवानगीपासून ते स्वागत कमानी व त्यावरील जाहिरातींवर कर आकारणी करून गणेशभक्तांचा छळ केला हे कमी की काय म्हणून श्री विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, डीजे वाजविण्यास बंदी घालून पारंपरिक वाद्य वाजविण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे एकूणच गणेशभक्तांसमोर पुढच्या वर्षी उत्सव साजरा करावा की नाही, अशी प्रश्न उभा ठाकला आहे. आता सरकारने रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यासाठी शिथिल केलेल्या नियमाची माहिती दडपण्यासही सुरुवात केली असून, यंदा नियमानुसार गणेशोत्सवात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास व देखावे खुले ठेवण्यास अनुमती असताना पोलीस व जिल्हा प्रशासनाने त्याची माहिती गणेश मंडळे व गणेशभक्तांपासून दडवून ठेवली आहे. परिणामी सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत अनुमती असतानाही पोलिसांनी रात्री दहानंतर गणेश मंडळांना त्यांची वाद्ये, ध्वनिक्षेपक व देखावे बंद करण्यास भाग पाडले आहे. आगामी तीन दिवस मात्र गणेशभक्तांना रात्री बारा वाजेपर्यंत मुभा आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPoliceपोलिस