शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:36 IST

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास लिमिटेड कारखान्यातील १२८ कंत्राटी कामगारांचे नऊ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे.

ठळक मुद्दे१२ कामगारांनी एक तास आंदोलन केल्याने संतप्त झालेल्या व्यवस्थाने ‘त्या’ कामगारांना निलंबित केले.

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास लिमिटेड कारखान्यातील १२८ कंत्राटी कामगारांचे नऊ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे.दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतन कराराकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यापैकी १२ कामगारांनी एक तास आंदोलन केल्याने संतप्त झालेल्या व्यवस्थाने ‘त्या’ कामगारांना निलंबित केले. संबंधित कामगारांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतानाच उर्वरित कामगारांचीही वेतन कपात करून अटी-शर्ती लादल्याने कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे. सर्व स्थानिक कामगार असून त्यांच्यावर कारखाना व्यवस्थापनाकडून अन्याय होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.कारखान्यातील हे कामगार गेल्या २३ वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहेत. जुना एल अ‍ॅण्ड टी कारखाना हिंदुस्थान नॅशनल ग्लासने विकत घेतल्यानंतर हे कामगार नव्या कारखान्याकडे वर्ग झाले होते. हे कामगार ‘सिटू’ या मान्यताप्राप्त संघटनेचे सभासद आहेत. कंत्राटी कामगार व व्यवस्थापन यांच्यात त्रैवार्षिक वेतन करार केला जातो. मात्र, करार संपून पुन्हा तीन वर्षे लोटली तरी व्यवस्थापन नव्या करारावर बोलणी करीत नसल्याने काही कामगारांनी महिनाभरापूर्वी तासभरासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.२२ वर्षांची सेवा खंडित करता येणार नाही व्यवस्थापनाने आंदोलनात पुढाकार घेणाºया १२ कामगारांना निलंबित करून त्यांची अंतर्गत चौकशी सुरू केली. दरम्यानच्या काळात कारखान्याच्या प्रवेशद्वारावर या कामगारांचा रोज बेसिक १०५ रु पयांनी कमी करणे, कॅन्टीन सेवा बंद करणे, युनियनचा राजीनामा देणे या अटी मान्य असल्यास कामावर येण्याबाबत लावल्याने कामगारांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.आंदोलनकर्त्या कामगारांची खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे यांनी भेट घेतली. प्रश्न १२ कामगारांचा असताना अन्य कामगारांना त्रास का? असा सवाल त्यांनी व्यवस्थापनाला केला. त्यावर चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर निर्णय घेऊ असे व्यवस्थापनाने सांगितले. कामगार उपायुक्त विकास माळी यांनी कामगारांची २२ वर्षांची सेवा खंडित करता येणार नाही, किरकोळ कारणावरून कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असे सांगूनही व्यवस्थापनाने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे समजते.