शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून स्वतंत्र आधार केंद्रे देवयानी फरांदे : चौदा नवीन केंद्रे सुरू करण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:13 IST

जेईई परीक्षेसाठी बसणाºया विद्यार्थ्यांना ‘आधार’ची सक्ती करण्यात आली असली तरी, सध्या आधार केंद्रेच नसल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोमवारपासून फक्त विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चार आधार केंद्रे सुरू करण्यात येणार

ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचना शासकीय योजनांसाठी आधारची सक्ती

नाशिक : जेईई परीक्षेसाठी बसणाºया विद्यार्थ्यांना ‘आधार’ची सक्ती करण्यात आली असली तरी, सध्या आधार केंद्रेच नसल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोमवारपासून फक्त विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चार आधार केंद्रे सुरू करण्यात येणार असून, याशिवाय आणखी दहा आधार केंद्रे दोन दिवसांत कार्यान्वित करण्यात येणार आहेत. आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेऊन नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.केंद्र सरकारकडून सर्वच शासकीय योजनांसाठी आधारची सक्ती करण्यात आली आहे, तथापि नाशिक शहरात बोटावर मोजण्याइतकेच आधार केंदे्र सुरू असल्याने नागरिकांची मोठी रीघ लागू लागली आहे. याशिवाय जेईई परीक्षेसाठी बसणाºया विद्यार्थ्यांना दहावीत असलेल्या त्यांच्या नावाचेच आधार कार्ड व त्यावरील क्रमांक परीक्षेच्या प्रवेशासाठी सक्ती करण्यात आली आहे. मुळात दहावीच्या गुणपत्रकावर विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव अगोदर व नंतर त्याचे व पालकांचे नाव आहे तर आधार कार्डावर अगोदर विद्यार्थ्याचे नाव त्यानंतर पालक व शेवटी आडनावाचा उल्लेख आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यात अडचणी येत आहेत. या परीक्षेसाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत असल्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ उडाली आहे. या गोष्टींची दखल घेत आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांची भेट घेतली व आधारबाबत नागरिकांना येणाºया अडचणींचा ऊहापोह केला. यावेळी जिल्हाधिकाºयांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चार केंद्रे नाशिक महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या तसेच आणखी दहा केंद्रेदेखील महापालिकेच्याच नागरी सुविधा केंद्रावर सुरू करण्याचे आश्वासन दिले.नागरिकांच्या आधारबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी १९४७ हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नाशिक महापालिकेकडून आधार केंद्रांसाठी पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य मिळत नसल्याने ते मिळण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक बापू सोनवणे, देवदत्त जोशी, सुनील देसाई, शाहीन मिर्झा, हिमगौरी आडके, मुन्ना हिरे, श्याम बडोदे, स्वाती भामरे, दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, यशवंत निकुळे, शिवा जाधव, कुणाल निफाडकर आदी उपस्थित होते.